शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पहिल्याच पावसात पितळ उघडे

By admin | Updated: June 25, 2015 00:31 IST

मान्सूनपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांची व घाण कचऱ्याची साफसफाई करणे गरजेचे आहे.

अड्याळ येथील प्रकार : नाल्या व घाण कचऱ्याने ग्रामस्थ त्रस्त, आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताअड्याळ : मान्सूनपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांची व घाण कचऱ्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. अड्याळ ग्रामपंचायतीने नाल्यांची साफसफाई कागदोपत्री केल्याने पहिल्याच पावसाने ग्रामपंचायतीचे पितळ उघडे पडले. पावसाळ्यापूर्वी नालीची साफसफाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने नालीची साफसफाई केली नाही. त्यामुळे पहिल्या पावसातच ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार उघडकीस आला. नाल्या अगोदरच कचऱ्याने तुंबल्या असल्याने पहिल्या पावसामुळे नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहू लागले. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासन नियमावर बोट ठेवून कराची वसुली करते.मात्र, गावातील सोई सुविधांकडे त्यांनी पुरते दुर्लक्ष केले आहे. पावसाळा सुरु होऊनही नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून गावातील पथदिव्यांची समस्याही जैसे थे आहे. याकडे लक्ष देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाला मुळीच स्वारस्य नाही. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अड्याळ येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गावातील नाल्या घाणीने साचून असल्याने पावसाळ्याचे पाणी गटारातून वाहनू जाण्याऐवजी ते रस्त्यांवर वाहू लागले. ते घाण पाणी अनेकांच्या घरात घुसले. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नाल्या तुंबून असल्याने अनेक वॉर्डातील घरासमोर डबक्यांची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सदर पाणी वाहून जावे यासाठी नागरिकांनीच नाल्यांची साफसफाई तथा गटारातील पाणी सरळ जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीरतेने घेऊन नाल्यांची साफसफाई करावी व नागरिकांना सुदृढ आरोग्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)