शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिवणी, बेला ग्रामपंचायतींना प्रथम पुरस्कार

By admin | Updated: April 3, 2017 00:37 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०१६-१७ या वर्षात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीने पाहणी केली.

१४ पैकी ७ ग्रामपंचायतींचा समावेश : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार घोषित भंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०१६-१७ या वर्षात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीने पाहणी केली. यात जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायतींना पुरस्कार घोषित केले आहे. यात लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) व भंडारा पंचायत समितीमधील बेला ग्रामपंचायतींना संयुक्तरित्या प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. ही घोषणा शनिवारला जिल्हा परिषद प्रशासनाने केली. विजयी क्रमांक लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) ग्रामपंचायतीला तर द्वितीय पुरस्कार साकोली तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीला मिळाला आहे. विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये लाखांदूर तालुक्यातील पुयार, तुमसर तालुक्यातील राजापूर व मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा समिती सचिव सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणी मुल्यांकन करण्यात आले. २१ ते २४ मार्च दरम्यान ही तपासणी मुल्यांकन करण्यात आले. याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. यात प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश होता. तालुकास्तरीय समितीने या ग्रामपंचायतीचे सर्वप्रथम पाहणी करून तसा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर केला. त्या अहवालानंतर जिल्हास्तरीय तपासणी समितीने पंचायत समिती स्तरावरील ग्रामपंचायतींची तपासणी केली. यात सर्वदृष्टीने निकषास पात्र ठरलेल्या शिवणी, बेला, रेंगपार (कोहळी), वडद, पुयार, राजापूर व पांढराबोडी या ग्रामपंचायतीची पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने एका समारंभात वितरीत करण्यात येईल. (शहर प्रतिनिधी)लाखनी तालुक्याला दोन तर पवनीला शून्य संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात आला आहे. यात लाखनी तालुक्यातील शिवणी व भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेलाचा समावेश आहे. शिवणीसह द्वितीय पुरस्कारप्राप्त करणारी रेंगेपार (कोहळी) ही ग्रामपंचायत लाखनी तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. लाखनीला दोन, भंडारा, साकोली, लाखांदूर, तुमसर, मोहाडी या तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर पवनी तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त करता आला नाही. विशेष पुरस्काराचे मानकरीसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विशेष पुरस्काराचे प्रायोजन करण्यात आले होते. या पुरस्कारात कुटुंब कल्याण या विषयाकरिता स्व.आबासाहेब खेडकर पुरस्काराचे मानकरी ग्रामपंचायत पुयार (लाखांदूर) ठरली आहे. तर पाणी व्यवस्थापन या विषयाकरिता स्व.वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत राजापूर (तुमसर) ला प्राप्त झाला आहे. तसेच सामाजिक एकता विषयांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत पांढराबोडी (मोहाडी) ला मिळाला आहे. ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी गाव विकासासाठी एकजुट साधली. यातूनच गावाचा विकास शक्य झाला आहे. हे विकासाचे सातत्य प्रत्येकानी टिकवून ठेवून गावाचे नाव उंचवावे.-शरद अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.ग्रामपंचायतीने सुंदर काम केलेले आहे. अभियानामुळे लोकांचे जीवनमान, शैक्षणिक दर्जा यात सुधारणा होण्यास मदत मिळते. नागरिकांनी घेतलेल्या पुढाकारातून गाव सर्वांगसुंदर बनले आहेत. यामुळे शासकीय योजनांमधूनही गावांचा विकास साधता येतो.- सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.