शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

पहिली ते नववी ५० टक्के, तर दहावी-बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे यंदाच्या ...

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षिणक सत्राची सुरुवात सुद्धआ ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के, तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांना १०० टक्के शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

यासंदर्भातील निर्देश सुद्धा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढले आहे. जिल्हा परिषदेच्या ७९४, न. प.च्या २२, केंद्रीय सहा, अनुदानित ३४१ आणि विनाअनुदानित १५८ शाळा असून, या सर्व शाळांना २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सवाने ऑनलाइन पद्धतीनेच साजरा करण्यात येणार आहे.

शिक्षक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत जावून दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे बोलल्या जाते. २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असली तरी शाळेच्या पहिल्या दिवसाची घंटा सुद्धा ऑनलाइनचा वाजणार असून, विद्यार्थ्यांचा किलबिलाटदेखील ऑनलाइनच ऐकावा लागणार आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण १३२१ शाळा असून, ७,८२६ शिक्षक विद्यार्जनाचे धडे देतात. भंडारा तालुक्यातील २६७ शाळांमध्ये १९८४ शिक्षक, लाखांदूर १४३ शाळांमध्ये ७०७ शिक्षक, लाखनी १५० शाळांमध्ये ८६९, मोहाडी १६० शाळांमध्ये ९५२, पवनी १९६ शाळांमध्ये ९९५, साकोली १५७ शाळांमध्ये ८८६, तर तुमसर तालुक्यातील २४८ तालुक्यांमध्ये १४३३ शिक्षक कार्यरत आहेत. तसेच यासह विनाअनुदानित शाळांचे बहुसंख्य शिक्षक ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना ज्ञानर्जन करणार आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय यांनी पत्र जारी करून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू करण्याविषयी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. या पत्रामध्ये इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. इयत्ता दहावी व बारावीचे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य आहे. यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती, तर प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आदेश धडकले आहे.