बारावीचा निकाल : जिल्ह्यात दुसराभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालामध्ये भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण विभागातून दर्शन ब्राह्मणकर हा विद्यार्थी ५९६ (९१.६0 टक्के) गुण घेऊन प्रथम आला आहे. भंडारा शहरातील नामांकित सायन्स अँकेडमीत तो शिकवणी वर्गाला होता. या अँकेडमीचा बारावीचा निकाल १00 टक्के लागला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यापेक्षा मागे राहू नये, याकरिता अभिनव पॅटर्न देण्याची क्षमता सायन्स अँकेडमीने विकसित केली आहे. उच्च माध्यमिक परीक्षेच्या नियमित अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अभियांत्रिकी शाखेत जाऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांकरिता जेईई प्लस आयआयटी व वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणार्या विद्यार्थ्याकरिता एआयपीएमटी एमएचसीईटी परीक्षेची तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून केली जाते. याकरिता सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्षाची सुविधा केली आहे.पहिल्याच वर्षात मिळालेल्या यशासोबत सायन्स अँकेडमीचा यशाचा आलेख निरंतर वाढतच जाणार, असा विश्वास सायन्स अँकेडमीचे संचालक व प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर यांनी व्यक्त केला आहे.(नगर प्रतिनिधी)
ग्रामीण भागातून दर्शन जिल्ह्यात पहिला
By admin | Updated: June 7, 2014 01:26 IST