शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

गायमुख मंदिर परिसरातील जंगलात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:24 IST

गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली.

अनर्थ टळला : आंबागड किल्ला परिसरातही आगीने वनसंपदा स्वाहा तुमसर : गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. वणवा पेटलेल्या जागेपासून १० ते १२ फूट अंतरावर चारचाकी वाहनतळ होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती.गायमुख येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. सातपुडा पर्वत रांगात हे यात्रा स्थळ आहे. दीड ते दोन लाख भाविक यात्रेनिमित्त येतात. शुक्रवारी रात्री लोहारा मार्गावरील या जंगलात आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीनंतर वाहनधारकांनी वाहने तिथून हलविले. अन्यथा अनर्थ घडला असता. मोहाडी तालुक्यातील गायमुख यात्रास्थळी तुमसर, मोहाडी तालुक्यातील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी राहतात. आग कुणी लावली याची माहिती कुणालाही नाही. आगीचे लोळ दिसल्याने एकच धावपळ उडाली. परतीच्या मार्गावर ही आग असल्याने भाविकांनी काढता पाय घेतला. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलातील झाडांची पाने गळून पडल्याने पालापाचोळा व गवत सध्या वाळलेले आहे. त्यामुळे आग जंगल परिसरात लवकर पसरते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला भाविकांचे जत्थे होते. त्यांच्यात भीतीचे सावट पसरले होते. (तालुका प्रतिनिधी) गायमुख यात्रा परिसरात अंधारविदर्भात लहान महादेव म्हणून गायमुख प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात विजेची सोय आहे. मंदिर प्रवेशद्वारानंतर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. आंबागड तथा लोहारा रस्त्याशेजारी भाविकांचे जत्थे होते. त्यांनी शेतात आश्रय घेतला होता. लोहारा रस्त्यावर कुठेही प्रकाश व्यवस्था नाही. प्रशासनाने यात्रेनिमित्त विजेची व्यवस्था करणे गरजेचे होते. पुरूष भाविकांसोबत महिला भाविकांची संख्या मोठी होती. रात्री हा परिसर काळोखात असतो. महिला भाविक येथे सुरक्षित राहू शकत नाही.आंबागड किल्ल्याजवळ आगशुक्रवारी आंबागड किल्ल्याला आग लागल्यची वार्ता पसरली. किल्ल्याजवळ काही मजुरांनी आग लावली होती. ही आग किल्ल्याच्या पायथ्याशी लागली होती. तेंदूपत्ता व मोहफूल गोळा करण्याकरिता ही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. नंतर मजुरांनीच ही आग विझविल्याची माहिती आहे. ऐतिहासिक गड किल्ल्याजवळ आगीच्या घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.