शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन यंत्रणा वाहनांअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:18 IST

आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे.

पाच तालुक्यात वाहन नाही : आयुध निर्माणी, सनफ्लॅगच्या अग्निशमन वाहनावर राहावे लागते अवलंबूनइंद्रपाल कटकवार भंडाराआग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे. मुबलक आणि प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिसून येतो. एकंदरीत भंडारा व तुमसर तालुक्यातच अग्नीशामक यंत्रणा असली तरी अन्य तालुक्यांचा भारही या विभागावर येत असल्याने संपूर्ण अग्नीशामक यंत्रणा भंडारा जिल्ह्यात कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. या विभागाला अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.तुमसर येथे नगरपालिका कार्यालयात अग्नीशामक कार्यालय आहे. ८ वर्षापूर्वी येथे वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनाची जिल्ह्यात मागणी होत असते. नेहमी आग विझविण्यासाठी वाहन उपलब्ध असते. आगीच्या घटना उन्हाळ्यात अधिक प्रमाणात होत असल्याने येथील कर्मचारी नेहमी सज्ज असतात. भंडारा येथे अग्नीशामक दलासाठी स्वतंत्र कार्यालय नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशामक दलाची भूमिका महत्वाची असते. मात्र लाखांदूर तालुक्यात कुठेही अग्नीशामन दल नसल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील जनतेला अचानक लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून राहावे लागते. पवनी नगर पालिकेने २०१३ मध्ये अग्नीशामकदलाचे वाहन खरेदी केले. या वाहनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, अद्यापही या अग्नीशामक दलासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. परीणामी नवीकोरे वाहन शोभेची वास्तू ठरत आहे. यापुर्वी पवनी तालुक्यात आगीच्या अनेक घटना घडल्या. तालुक्यात चौरास भागात आगीने अनेकवेळा शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी भंडारा येथून वाहन बोलाविण्यात येते. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळापर्यत पोहचेपर्यत धानपीके किंवा अन्य पिके जळून भस्मसात झाले आहेत.साकोली तालुक्यासाठी अग्नीशमन दलाची यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे यंत्रणा स्थापन करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन अनेकदा साकोलीवासीयांनी उन्हाळ्यात दिले आहे. मात्र या मागणीकडे नेहमीच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आग विझविण्यासाठी नागरिक स्वत: मिळेल त्या साधनाने प्रयत्न करीत असतात.मोहाडी तालुक्यातही अग्नीशामक यंत्रणा नाही. तालुक्यात एखादी घटना घडल्यास भंडारा किंवा तुमसर येथील अग्नीशामक विभागाला पाचारण करावे लागते. अशीच अवस्था लाखनी तालुक्याचीही आहे. खासगी अग्नीशामक व्यवस्थेवर बहुतांश वेळा अवलंबून राहावे लागते. एकंदरीत जिल्हा हा अग्नीशामन यंत्रणेबाबत ढेपाळलेला दिसून येतो. अग्नीशामक विभागात विभागप्रमुख, फायरमन, वाहनचालक, मदतीला दिलेले कर्मचारी, मदतनीस, चौकीदार यांची गरज असते. भंडारा, तुमसरातच वाहनेभंडारा, तुमसर व पवनी नगर परिषदेकडे अग्नीशमन वाहने उपलब्ध आहेत. परंतु पवनी नगर परिषदेचे वाहन चालकाअभावी बंद आहे. जिल्ह्यात कुठेही आगीच्या घटना घडल्या तर भंडारा व तुमसर येथून वाहने जात असतात. तुमसर टोकावर असल्यामुळे ते वाहन साकोली, लाखांदूर येथे जाण्यासाठी बराच उशिर लागतो. त्याठिकाणी भंडारा येथील वाहन घेऊन जावे लागते. त्याशिवाय आयुध निर्माणी कारखाना जवाहरनगर आणि वरठी येथील सनफ्लॅग कारखान्याच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते.