शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

अग्निशमन यंत्रणा वाहनांअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:18 IST

आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे.

पाच तालुक्यात वाहन नाही : आयुध निर्माणी, सनफ्लॅगच्या अग्निशमन वाहनावर राहावे लागते अवलंबूनइंद्रपाल कटकवार भंडाराआग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे. मुबलक आणि प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिसून येतो. एकंदरीत भंडारा व तुमसर तालुक्यातच अग्नीशामक यंत्रणा असली तरी अन्य तालुक्यांचा भारही या विभागावर येत असल्याने संपूर्ण अग्नीशामक यंत्रणा भंडारा जिल्ह्यात कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. या विभागाला अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.तुमसर येथे नगरपालिका कार्यालयात अग्नीशामक कार्यालय आहे. ८ वर्षापूर्वी येथे वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनाची जिल्ह्यात मागणी होत असते. नेहमी आग विझविण्यासाठी वाहन उपलब्ध असते. आगीच्या घटना उन्हाळ्यात अधिक प्रमाणात होत असल्याने येथील कर्मचारी नेहमी सज्ज असतात. भंडारा येथे अग्नीशामक दलासाठी स्वतंत्र कार्यालय नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशामक दलाची भूमिका महत्वाची असते. मात्र लाखांदूर तालुक्यात कुठेही अग्नीशामन दल नसल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील जनतेला अचानक लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून राहावे लागते. पवनी नगर पालिकेने २०१३ मध्ये अग्नीशामकदलाचे वाहन खरेदी केले. या वाहनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, अद्यापही या अग्नीशामक दलासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. परीणामी नवीकोरे वाहन शोभेची वास्तू ठरत आहे. यापुर्वी पवनी तालुक्यात आगीच्या अनेक घटना घडल्या. तालुक्यात चौरास भागात आगीने अनेकवेळा शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी भंडारा येथून वाहन बोलाविण्यात येते. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळापर्यत पोहचेपर्यत धानपीके किंवा अन्य पिके जळून भस्मसात झाले आहेत.साकोली तालुक्यासाठी अग्नीशमन दलाची यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे यंत्रणा स्थापन करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन अनेकदा साकोलीवासीयांनी उन्हाळ्यात दिले आहे. मात्र या मागणीकडे नेहमीच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आग विझविण्यासाठी नागरिक स्वत: मिळेल त्या साधनाने प्रयत्न करीत असतात.मोहाडी तालुक्यातही अग्नीशामक यंत्रणा नाही. तालुक्यात एखादी घटना घडल्यास भंडारा किंवा तुमसर येथील अग्नीशामक विभागाला पाचारण करावे लागते. अशीच अवस्था लाखनी तालुक्याचीही आहे. खासगी अग्नीशामक व्यवस्थेवर बहुतांश वेळा अवलंबून राहावे लागते. एकंदरीत जिल्हा हा अग्नीशामन यंत्रणेबाबत ढेपाळलेला दिसून येतो. अग्नीशामक विभागात विभागप्रमुख, फायरमन, वाहनचालक, मदतीला दिलेले कर्मचारी, मदतनीस, चौकीदार यांची गरज असते. भंडारा, तुमसरातच वाहनेभंडारा, तुमसर व पवनी नगर परिषदेकडे अग्नीशमन वाहने उपलब्ध आहेत. परंतु पवनी नगर परिषदेचे वाहन चालकाअभावी बंद आहे. जिल्ह्यात कुठेही आगीच्या घटना घडल्या तर भंडारा व तुमसर येथून वाहने जात असतात. तुमसर टोकावर असल्यामुळे ते वाहन साकोली, लाखांदूर येथे जाण्यासाठी बराच उशिर लागतो. त्याठिकाणी भंडारा येथील वाहन घेऊन जावे लागते. त्याशिवाय आयुध निर्माणी कारखाना जवाहरनगर आणि वरठी येथील सनफ्लॅग कारखान्याच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते.