शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सायकल दुकानाला आग लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत ...

अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सायकल व इतर साहित्य जळून खाक झाले. बाहेरून अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, या आगीत सायकल दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस झाला. वादळामुळे शहरातील वीज बंद होती. स्थानिक अर्बन बँकेनजीक राजेश सायकल स्टोअर आहे. या दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचे कुणीतरी बघितले. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. शहरातील सेवाभावी मंडळींनी आग विझविण्याचा बराच प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील बऱ्याच सायकली व इतर साहित्य जळून खाक झाले होते. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. शहरात व तालुक्याच्या इतर गावांत आगीच्या अनेक घटना घडत असतात. मात्र, तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नाही. मागील काळात अग्निशमन वाहन खरेदीचा नगरपंचायतीने प्रस्ताव तयार केला होता. नंतर कुठे घोडे अडले कुणास ठाऊक? तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन वाहन नसणे ही दुर्दैवी बाब आहे. ही सुविधा असती, तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून झालेले नुकसान टाळता येऊ शकले असते.