शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करून मजुरांना ...

भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावातील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नसल्याने मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकावे लागत आहे. शासन, प्रशासनाच्या संबंधित विभागाने मजुरांना वर्षातून शंभर दिवस काम उपलब्ध करून द्यावे, असा शासन निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असली तरी अजूनपर्यंत पर्याप्त प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, ही कामे सुरू करण्यास अतिविलंब होत असल्याने कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यासमोर वीतभर पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याबाबत मजुरांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.

याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी या तालुक्यांतील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, संदीप बर्वे, रतन मेश्राम, नंदू वाघमारे, मोरेश्वर लेंधारे, अविनाश खोब्रागडे, सुधाकर चव्हाण, उमाकांत काणेकर, यशवंत घरडे, सुरेश शेंडे, मिताराम शेंडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, दामोधर गोडबोले, अरूणा दामले, पपिता वंजारी, जसवंता नंदेश्वर, रूपा लेंधारे, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, सुमन वंजारी, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, सरिता टेंभुर्णे, वनमाला बोरकर, मनीषा मेश्राम, संयोगिता खोब्रागडे, सुधाकर धारगावे, सुभाष उंदीरवाडे, जयपाल ढवळे, सुरेश उंदीरवाडे, कल्पना वानखेडे, कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.