शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

रोहयो कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करून मजुरांना ...

भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावातील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नसल्याने मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकावे लागत आहे. शासन, प्रशासनाच्या संबंधित विभागाने मजुरांना वर्षातून शंभर दिवस काम उपलब्ध करून द्यावे, असा शासन निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असली तरी अजूनपर्यंत पर्याप्त प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, ही कामे सुरू करण्यास अतिविलंब होत असल्याने कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यासमोर वीतभर पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याबाबत मजुरांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.

याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी या तालुक्यांतील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, संदीप बर्वे, रतन मेश्राम, नंदू वाघमारे, मोरेश्वर लेंधारे, अविनाश खोब्रागडे, सुधाकर चव्हाण, उमाकांत काणेकर, यशवंत घरडे, सुरेश शेंडे, मिताराम शेंडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, दामोधर गोडबोले, अरूणा दामले, पपिता वंजारी, जसवंता नंदेश्वर, रूपा लेंधारे, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, सुमन वंजारी, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, सरिता टेंभुर्णे, वनमाला बोरकर, मनीषा मेश्राम, संयोगिता खोब्रागडे, सुधाकर धारगावे, सुभाष उंदीरवाडे, जयपाल ढवळे, सुरेश उंदीरवाडे, कल्पना वानखेडे, कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.