शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रोहयो कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:44 IST

रबी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांतील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे ...

रबी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांतील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नसल्याने मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकावे लागत आहे. शासन प्रशासनाच्या संबंधित विभागाने मजुरांना वर्षातून शंभर दिवस काम उपलब्ध करून द्यावे, असा शासन निर्णय आहे.

सदर निर्णयाची अंमलबजावणी करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असली तरी अजूनपर्यंत पर्याप्त प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे मजूरवर्ग रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, सदर कामे सुरू करण्यास अतिविलंब होत असल्याने कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याबाबत मजुरांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे. जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी या तालुक्यांतील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.

निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, संदीप बर्वे आदींची नावे आहेत.