शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अखेर पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ ...

ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाचे यश : विजयादशमीला सामूहिक जलसमाधीच्या इशाऱ्यानंतर साखळी उपोषणाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या सहकार्याने सुरू केलेल्या साखळी उपोषणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाचे पाणी भंडारा तालुक्यातील अखेरच्या टोकापर्यत पोहचल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले.शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करून उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष बैठकीत सांगितले.पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असलेल्या भंडारा तालुक्यातील शेतीकरिता या प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन करण्यात आले. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले. परंतु, भंडारा तालुक्याला पेंच प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. परिणामी, गुरूवार ११ आॅक्टोबरपासून सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी भंडारा येथे पांढराबोडी रस्त्यावरील किसान चौकात साखळी उपोषण सुरू केले. १७ आॅक्टोबरपर्यत उपोषण करून १८ आॅक्टोबर रोजी विजयादशीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या एखाद्या नहरात सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.दरम्यान, पेंच प्रकल्पाच्या पाण्यासाठी आंदोलन अधिकच तीव्र होत असल्याचे पाहून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी शंतनु गोयल यांनी तातडीची बैठक आयोजित करून नरेंद्र भोंडेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले. भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचविण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याअभावी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून अल्पावधीत पंचनामे करण्यात येतील, या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा नियमीत लाभ घेता यावा, याकरिता दाभा-टाकळी येथील नियोजित उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात येईल, यापूर्वी खुर्शीपार आणि मुजबी येथे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पेंच प्रकल्पाचे पाणी तालुक्यात पोहचल्याने तसेच इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने साखळी उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरूवारीच सायंकाळी किसान चौकात पोहचलेले तहसीलदार अक्षय पोयाम यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देवून साखळी उपोषण सोडविले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.