शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ ...

ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाचे यश : विजयादशमीला सामूहिक जलसमाधीच्या इशाऱ्यानंतर साखळी उपोषणाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या सहकार्याने सुरू केलेल्या साखळी उपोषणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाचे पाणी भंडारा तालुक्यातील अखेरच्या टोकापर्यत पोहचल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले.शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करून उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष बैठकीत सांगितले.पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असलेल्या भंडारा तालुक्यातील शेतीकरिता या प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन करण्यात आले. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले. परंतु, भंडारा तालुक्याला पेंच प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. परिणामी, गुरूवार ११ आॅक्टोबरपासून सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी भंडारा येथे पांढराबोडी रस्त्यावरील किसान चौकात साखळी उपोषण सुरू केले. १७ आॅक्टोबरपर्यत उपोषण करून १८ आॅक्टोबर रोजी विजयादशीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या एखाद्या नहरात सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.दरम्यान, पेंच प्रकल्पाच्या पाण्यासाठी आंदोलन अधिकच तीव्र होत असल्याचे पाहून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी शंतनु गोयल यांनी तातडीची बैठक आयोजित करून नरेंद्र भोंडेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले. भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचविण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याअभावी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून अल्पावधीत पंचनामे करण्यात येतील, या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा नियमीत लाभ घेता यावा, याकरिता दाभा-टाकळी येथील नियोजित उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात येईल, यापूर्वी खुर्शीपार आणि मुजबी येथे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पेंच प्रकल्पाचे पाणी तालुक्यात पोहचल्याने तसेच इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने साखळी उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरूवारीच सायंकाळी किसान चौकात पोहचलेले तहसीलदार अक्षय पोयाम यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देवून साखळी उपोषण सोडविले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.