शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

अखेर डाव्या कालव्यात सोडले पाणी

By admin | Updated: July 18, 2016 01:28 IST

जिल्ह्यात पावसाने मागील ८ दिवसात दमदार हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हे नसल्याने पाण्याचा उपयोग झाला नाही.

पंचभाई यांच्या प्रयत्नांना यश : बळीराजा सुखावला, धडाक्यात रोवणी सुरु चिचाळ : जिल्ह्यात पावसाने मागील ८ दिवसात दमदार हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हे नसल्याने पाण्याचा उपयोग झाला नाही. मात्र पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी डावा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी रेटून धरली होती. शासनाने याची दखल घेवून डाव्या कालव्यात पाणी सोडल्याने कालव्या शेजारील शेतकऱ्यांची धडाक्यात रोवणी सुरु आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ९० हजार हेक्टर शेती जमीनीला सिंचनाची सोय असणाऱ्या गोसे खुर्द धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर, लाखनी व भंडारा तालुक्यातील एकूण २८७ गावांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टर शेत जमिनीला सिंचन होणार आहे. गोसे खुर्द प्रकल्पाचा पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्याची क्षमता असलेल्या मुख्य डाव्या कालव्याचे काम विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प एआयपीची अंतर्गत मुख्य विमोचन धरणाचे साक्र. ८२० मिटरवरुन सुरु आहे. कालव्याची एकूण लांबी २२.९३ किमी कालवा विसर्ग ४५.२२ घ.मी. सेकंद कालव्याचा तळ रुंदी १४०८८ मी. मुक्तांतर ०.९५ मी. कालव्याचा तळ उतार १.१००००, कालवाचा तळ पातळी २३८.०० एकुण सिंचन क्षेत्र (प्रवाह उपसा) ३०,४५५ ला लाभ घेता येणार आहे. प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा चिचाळ आकोट, कोंढा, सेंद्री, सोमनाळा, भावड, ब्रम्ही, रनेळा, आसगाव, आदी गावातून गेला आहे. सदर परिसरातील काळी कसदार जमीन चौरास म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, कांदा, हरबरा, मुंग, उळीद ज्वारी, लाख, लाखोरी, जवस आदी उत्पादन होतो. मात्र कंत्राटदाराच्या कामातील संथगतीने रब्बी हंगामाला मोठा फटका बसला होता. या वर्षाला वरुन राजाने जिल्ह्यात उशिरा दमदार हजेरी लावली परंतू शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हाची वाढ झाली नाही. त्यामुळे आलेले पाणी व्यर्थ गेले मात्र पं.स. सदस्य यांनी जिल्हाधिकारी व पूनर्वसन विभागाला अनेकदा खेट्या मारुन शासनाला कालव्यात पाणी सोडण्यास भाग पाडल्याने डावा कालवा शेजारील बळीराजाने इंजन व मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन रोवणी धडाक्यात सुरुवात झाली आहे. (वार्ताहर)