शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर डाव्या कालव्यात सोडले पाणी

By admin | Updated: July 18, 2016 01:28 IST

जिल्ह्यात पावसाने मागील ८ दिवसात दमदार हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हे नसल्याने पाण्याचा उपयोग झाला नाही.

पंचभाई यांच्या प्रयत्नांना यश : बळीराजा सुखावला, धडाक्यात रोवणी सुरु चिचाळ : जिल्ह्यात पावसाने मागील ८ दिवसात दमदार हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हे नसल्याने पाण्याचा उपयोग झाला नाही. मात्र पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी डावा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी रेटून धरली होती. शासनाने याची दखल घेवून डाव्या कालव्यात पाणी सोडल्याने कालव्या शेजारील शेतकऱ्यांची धडाक्यात रोवणी सुरु आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ९० हजार हेक्टर शेती जमीनीला सिंचनाची सोय असणाऱ्या गोसे खुर्द धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर, लाखनी व भंडारा तालुक्यातील एकूण २८७ गावांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टर शेत जमिनीला सिंचन होणार आहे. गोसे खुर्द प्रकल्पाचा पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्याची क्षमता असलेल्या मुख्य डाव्या कालव्याचे काम विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प एआयपीची अंतर्गत मुख्य विमोचन धरणाचे साक्र. ८२० मिटरवरुन सुरु आहे. कालव्याची एकूण लांबी २२.९३ किमी कालवा विसर्ग ४५.२२ घ.मी. सेकंद कालव्याचा तळ रुंदी १४०८८ मी. मुक्तांतर ०.९५ मी. कालव्याचा तळ उतार १.१००००, कालवाचा तळ पातळी २३८.०० एकुण सिंचन क्षेत्र (प्रवाह उपसा) ३०,४५५ ला लाभ घेता येणार आहे. प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा चिचाळ आकोट, कोंढा, सेंद्री, सोमनाळा, भावड, ब्रम्ही, रनेळा, आसगाव, आदी गावातून गेला आहे. सदर परिसरातील काळी कसदार जमीन चौरास म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, कांदा, हरबरा, मुंग, उळीद ज्वारी, लाख, लाखोरी, जवस आदी उत्पादन होतो. मात्र कंत्राटदाराच्या कामातील संथगतीने रब्बी हंगामाला मोठा फटका बसला होता. या वर्षाला वरुन राजाने जिल्ह्यात उशिरा दमदार हजेरी लावली परंतू शेतकऱ्यांकडे रोवणी योग्य पऱ्हाची वाढ झाली नाही. त्यामुळे आलेले पाणी व्यर्थ गेले मात्र पं.स. सदस्य यांनी जिल्हाधिकारी व पूनर्वसन विभागाला अनेकदा खेट्या मारुन शासनाला कालव्यात पाणी सोडण्यास भाग पाडल्याने डावा कालवा शेजारील बळीराजाने इंजन व मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन रोवणी धडाक्यात सुरुवात झाली आहे. (वार्ताहर)