शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अखेर बावनथडी जलाशयाचे पाणी नदीपात्रात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

उन्हाळी पिके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तत्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी ...

उन्हाळी पिके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तत्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे. तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला. त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारे पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. तसेच निससगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, गत पावसाळ्यात पडलेला अत्यल्प पाऊस व उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी, तलाव तळ गाठत आहेत. त्यावर शेती फिडरच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फटका बसला आहे. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी परत कर्जबाजारी होऊन नव्या उमेदीने उन्हाळी हंगामात ऊस व धान पीक शेतात पिकवले. परंतु विहारी, तलाव, बोअरवेल आटल्याने उभ्या पिकांना कसे वाचविता येईल, या विवंचनेत शेतकरी सापडला असतानाच बावनथडी जलाशयाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून केली होती. त्या केलेल्या पाठपुराव्यांना यश मिळाले असून, शेतकऱ्यांत पाणी सोडल्याने आनंद व्यक्त होत आहे. रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी आमदार राजू कारेमोरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून सतत पाठपुरावा केल्यानेच अखेर बावनथडी बावनथडी प्रकल्पाचे नदीपात्रात ४८ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांसह नदीपात्रालगतच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागल्याने नागरिक सुखावले आहेत.