शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

अखेर सिहोऱ्यात राज्य मार्गावर गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:06 IST

तुमसर - बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. याशिवाय राज्य मार्ग ...

तुमसर - बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. याशिवाय राज्य मार्ग अरुंद असल्याने वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. असे असले तरी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे रोज राज्य मार्गावर अपघात होत असल्याने वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने राज्य मार्गावर गतिरोधक उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. याशिवाय गतिरोधकांसाठी नागरिकांनी ओरड सुरू केली होती. दरम्यान, राज्य मार्गावरील सिहोरा गावात ग्रामीण सचिवालयाजवळ गतिरोधक उभारण्यात आले आहे. गतिरोधक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कंजुषी केल्याचे आरोप गावकरी करीत आहेत. टी पॉइंटवर दोन्ही बाजूने गतिरोधक निर्माण करण्यात आले नाहीत. या शिवाय बँक ऑफ इंडिया चौकातही गतिरोधक निर्माण करण्याचे टाळण्यात आले आहे. दरम्यान, चुल्हाड, हरदोली, मोहगाव खंदान, सिंदपुरी, बपेरा, देवसरा, बिनाखी गावांचे बस स्थानक परिसरात गतिरोधक तयार करण्यात आले नाही. यामुळे भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. याच बसस्थानक परिसरात अधिक अपघात झाले आहेत. गोंदेखारी बसस्थानकाशेजारी बँक असल्याने वाहनांचे गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची ओरड ग्राहक करीत आहेत; परंतु कुणी ऐकायला तयार नाही. संपूर्ण राज्य मार्ग अपघातग्रस्त झालेला असताना नूतनीकरणासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अधूनमधून राज्य मार्ग दुरुस्तीच्या चर्चा रंगल्या आहेत; परंतु या कामास बळ मिळाले नाही. कधी निधी नसल्याचे सांगण्यात आले, तर कधी निविदा निघाल्याचे माहिती देण्यात आली आहे; परंतु भूमिपूजनाचे नावावर टिकास धावली नाही. एरवी श्रेयाचे राजकारण होत असताना लोकप्रतिनिधी मात्र शांत असल्याने राज्य मार्ग नूतनीकरणावरून शंका येत आहे. अरुंद असणाऱ्या राज्य मार्गाचे रुंदीकरण झाले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

गावांतील रस्तेही भकास

कोरोना काळात राज्याची तिजोरी रिकामी झाल्याने अनेक रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम लांबणीवर गेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते निधीअभावी भकास झाले आहेत. ग्रामीण रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. बिनाखी ते गोंडीटोला मार्ग अशाच प्रकाराला बळी पडला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या मार्गाचे भूमिपूजन झाले; परंतु नंतर साधी गिट्टी आली नाही. रस्त्याचे डांबरीकरण लांबणीवर गेला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. माडगी ते बपेरा गावापर्यंत जोडणाऱ्या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.