शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अखेर दोन महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे ...

अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे दोन महिन्यापासून पथदिवे बंद होते. अखेर शुक्रवारी अड्याळ ग्रामपंचायतीने थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. मात्र आता वीज वितरण कंपनीनेही थकीत कर ग्रामपंचायतीला जमा करावा, असा ठराव घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ गावातील स्ट्रीट लाईट विद्युत बिलाचा भरणा न केल्याने विद्युत विभागाने तात्काळ बंद केली होती. यात आणखी महत्वाचे म्हणजे यापुर्वी हेच विद्युत बिल जिल्हा परिषदमार्फत भरले जायचे, पण नियमावलीत बदल झाल्याने आता तोही भार प्रत्येक ग्रामपंचायतच्या माथी पडला आहे. गत दोन दिवसांआधी माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांनी ग्रामस्थ तथा सर्पमित्र ,फ्रेंडस गृप, स्वरक्षण टीमच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पथदिवे बंद असल्याविषयी तथा विविध मागण्या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास अड्याळचे सरपंच तथा सदस्यांनी विद्युत उपकेंद्र अड्याळ येथे जाऊन थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. यावेळी सहाय्यक अभियंता सचिन चापेकर यांनी सायंकाळी पथदिवे सुरु होणार असे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामपंचायतने पलटवार करत एक निवेदनही दिले. त्यात महावितरण कंपनीवर गत २० वर्षांपासूनची कर आकारणी केली गेली नाही आणि त्याची आत्तापर्यंतची १८ लाख ५० हजार रुपये थकबाकी होत आहे. आता ग्रामपंचायतने ते कर घेण्यात यावे, असा ठराव मासिक सभेत घ्यावे, असेही विद्युत उपकेंद्र अड्याळमार्फत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. महत्वाचे म्हणजे पावसाचे दिवस,त्यातही सरपटणारे प्राणी आणि जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतने पथदिव्यांचे विद्युत बिल भरली नाहीत म्हणून तब्बल दोन महिन्यांपासून पथदिव्यांची विद्युत पुरवठा खंडित होऊन गावात सगळीकडे अंधार असल्याने भीती युक्त वातावरण, याला सामान्य ग्रामस्थ काय करणार?, अशावेळी गावातील ग्रामस्थ तथा सर्पमित्र, फ्रेन्ड्स गृप तथा स्वरक्षण टिमने पुढाकार घेऊन गावातील समस्या विषयीची चर्चा बैठक लावून त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विषयांवर चर्चा होऊन निवेदन देण्यात आले होते.