शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे ...

अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे दोन महिन्यापासून पथदिवे बंद होते. अखेर शुक्रवारी अड्याळ ग्रामपंचायतीने थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. मात्र आता वीज वितरण कंपनीनेही थकीत कर ग्रामपंचायतीला जमा करावा, असा ठराव घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ गावातील स्ट्रीट लाईट विद्युत बिलाचा भरणा न केल्याने विद्युत विभागाने तात्काळ बंद केली होती. यात आणखी महत्वाचे म्हणजे यापुर्वी हेच विद्युत बिल जिल्हा परिषदमार्फत भरले जायचे, पण नियमावलीत बदल झाल्याने आता तोही भार प्रत्येक ग्रामपंचायतच्या माथी पडला आहे. गत दोन दिवसांआधी माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांनी ग्रामस्थ तथा सर्पमित्र ,फ्रेंडस गृप, स्वरक्षण टीमच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पथदिवे बंद असल्याविषयी तथा विविध मागण्या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास अड्याळचे सरपंच तथा सदस्यांनी विद्युत उपकेंद्र अड्याळ येथे जाऊन थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. यावेळी सहाय्यक अभियंता सचिन चापेकर यांनी सायंकाळी पथदिवे सुरु होणार असे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामपंचायतने पलटवार करत एक निवेदनही दिले. त्यात महावितरण कंपनीवर गत २० वर्षांपासूनची कर आकारणी केली गेली नाही आणि त्याची आत्तापर्यंतची १८ लाख ५० हजार रुपये थकबाकी होत आहे. आता ग्रामपंचायतने ते कर घेण्यात यावे, असा ठराव मासिक सभेत घ्यावे, असेही विद्युत उपकेंद्र अड्याळमार्फत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. महत्वाचे म्हणजे पावसाचे दिवस,त्यातही सरपटणारे प्राणी आणि जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतने पथदिव्यांचे विद्युत बिल भरली नाहीत म्हणून तब्बल दोन महिन्यांपासून पथदिव्यांची विद्युत पुरवठा खंडित होऊन गावात सगळीकडे अंधार असल्याने भीती युक्त वातावरण, याला सामान्य ग्रामस्थ काय करणार?, अशावेळी गावातील ग्रामस्थ तथा सर्पमित्र, फ्रेन्ड्स गृप तथा स्वरक्षण टिमने पुढाकार घेऊन गावातील समस्या विषयीची चर्चा बैठक लावून त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विषयांवर चर्चा होऊन निवेदन देण्यात आले होते.