शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

अखेर दोन महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे ...

अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे दोन महिन्यापासून पथदिवे बंद होते. अखेर शुक्रवारी अड्याळ ग्रामपंचायतीने थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. मात्र आता वीज वितरण कंपनीनेही थकीत कर ग्रामपंचायतीला जमा करावा, असा ठराव घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ गावातील स्ट्रीट लाईट विद्युत बिलाचा भरणा न केल्याने विद्युत विभागाने तात्काळ बंद केली होती. यात आणखी महत्वाचे म्हणजे यापुर्वी हेच विद्युत बिल जिल्हा परिषदमार्फत भरले जायचे, पण नियमावलीत बदल झाल्याने आता तोही भार प्रत्येक ग्रामपंचायतच्या माथी पडला आहे. गत दोन दिवसांआधी माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांनी ग्रामस्थ तथा सर्पमित्र ,फ्रेंडस गृप, स्वरक्षण टीमच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पथदिवे बंद असल्याविषयी तथा विविध मागण्या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास अड्याळचे सरपंच तथा सदस्यांनी विद्युत उपकेंद्र अड्याळ येथे जाऊन थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. यावेळी सहाय्यक अभियंता सचिन चापेकर यांनी सायंकाळी पथदिवे सुरु होणार असे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामपंचायतने पलटवार करत एक निवेदनही दिले. त्यात महावितरण कंपनीवर गत २० वर्षांपासूनची कर आकारणी केली गेली नाही आणि त्याची आत्तापर्यंतची १८ लाख ५० हजार रुपये थकबाकी होत आहे. आता ग्रामपंचायतने ते कर घेण्यात यावे, असा ठराव मासिक सभेत घ्यावे, असेही विद्युत उपकेंद्र अड्याळमार्फत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. महत्वाचे म्हणजे पावसाचे दिवस,त्यातही सरपटणारे प्राणी आणि जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतने पथदिव्यांचे विद्युत बिल भरली नाहीत म्हणून तब्बल दोन महिन्यांपासून पथदिव्यांची विद्युत पुरवठा खंडित होऊन गावात सगळीकडे अंधार असल्याने भीती युक्त वातावरण, याला सामान्य ग्रामस्थ काय करणार?, अशावेळी गावातील ग्रामस्थ तथा सर्पमित्र, फ्रेन्ड्स गृप तथा स्वरक्षण टिमने पुढाकार घेऊन गावातील समस्या विषयीची चर्चा बैठक लावून त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विषयांवर चर्चा होऊन निवेदन देण्यात आले होते.