शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अखेर सातव्या दिवशी आरोग्य विभागात झगमगाट

By admin | Updated: June 1, 2017 00:29 IST

जि. प. प्रशासकीय इमारतीत असलेल्या आरोग्य विभागाचा विद्युत पुरवठा गुरुवारला बंद होता. यामुळे येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

प्रशासनाची उडाली तारांबळ : कामावर पडला परिणाम, वीज पुरवठ्याअभावी कर्मचाऱ्यांना उकाळा असह्यप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जि. प. प्रशासकीय इमारतीत असलेल्या आरोग्य विभागाचा विद्युत पुरवठा गुरुवारला बंद होता. यामुळे येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. याबाबद ^‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली. वृत्तानंतर आरोग्य विभागातील विद्युत पुरवठा आज बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुर्ववत सुरु करण्यात आला. गुरुवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे येथील विद्युत पुरवठा पुर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे संगणक प्रणालीवर होणारे कामकाज प्रभावीत झाले. आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या साथरोग, एनएचआरएम, संगणक कक्ष हे प्रभावित झाले. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील कर्मचारी कार्यालयाएवजी बाहेर भटकंती करताना दिसून आले. आरोग्य विभागाच्या वीज पुरवठ्याबाबद देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. मात्र या विभागाने पुढील आठ दिवस निधीची तरतुद झाल्यानंतर वीज पुरवठा पुर्ववत होईल, अशी भूमिका घेतली होती. याबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात ‘पाच दिवसापासून आरोग्य विभागाची बत्तीगुल’ या शिषर्काचे वृत्त प्रकाशित केले. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. ज्या बांधकाम विभागाने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी कारणंमिमांसा केली. यानंतर बांधकाम विभागाने तातडीने येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या. शॉर्ट सर्किटमुळे जळालेले वायरींग व अन्य साहित्य तातडीने खरेदी केले. आज बुधवारला आरोग्य विभागाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले. मागील सात दिवसांपासून अंधारात चाचपळणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी उकाळ्यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यानी लगतच्या बांधकाम व समाजकल्याण सभापतीच्या कक्षातून तात्पूरती विद्युत जोडणी घेवून कुलर सुरु केले होते. मात्र तब्बल सात दिवसानंतर आज विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांनी उकाळ्यातून सुटकेचा नि:श्वास सोडला.मानले लोकमतचे आभारगुरुवारला शॉर्टसर्किटमुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. एक -दोन नव्हे तर तब्बल पाच दिवसानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत मंगळवारला लोकमतने वृत्त प्रकाशित केले. यामुळे जि.प. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करुन दिला. खंडीत वीज पुरवठा सुरळीत झाला त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी लोकमतच्ये आभार मानले.