शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

अखेर सुरक्षा रक्षकांना मिळाले सहा महिन्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देकारखाना व्यवस्थापनाची शिष्टाई : शिवसेनेच्या आंदोलनाचे यश, सुरक्षा रक्षकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथे मानस साखर कारखाना असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक यांचे गत सहा महिन्यापासून पगार झाले नाही. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांपुढे जगण्याचे मोठे आव्हान असताना कामाचा दाम मिळत नसल्याने ११ ऑगस्ट रोजी मानस साखर कारखाना देव्हाडा येथे शिवसेना मोहाडी तालुका शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांच्या नेतृत्वाखाली व सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.अखेर मानस साखर कारखान्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांच्या मध्यस्थीने तोडगा काढून पगार देण्यास येईल, असे सांगून मध्यस्थी करण्यात आली व संबंधित एजंसीच्या वतीने पगार वाटप करण्यात आले.कंपनीने जर पगार दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षक हे कंपनीचे नसून एजन्सीचे आहेत.एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. शिवसेना प्रमुख अनिल सार्वे यांचे कडून आंदोलन मागे घेण्यात आले.सुरक्षा रक्षकाकडून साखर कारखान्यावर बिनबुडाचे आरोप करीत होते ते खोटे आहे. कारण सुरक्षा रक्षकाची भरती एजेन्सीकडून केले जाते. त्यांना कारखानाकडून बंद केले जात नाही. त्याची जबाबदारी एजेन्सीवर असते. परंतु सुरक्षा रक्षक आम्हाला धारेवर धरतात. सुरक्षा रक्षकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.-विजय राऊत, व्यवस्थापक, मानस साखर कारखाना, देव्हाडा.व्यवस्थापनाकडून तोडगाभंडारा जिल्ह्यात एकमात्र साखर कारखाना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे असून या ठिकाणी ४० सुरक्षा रक्षक कामावर आहेत. गत सहा महिन्यांपासून १२ सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचा पैसा मिळाला नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन करण्यात आले. याची दखल घेऊन व्यवस्थापनाने तोडगा काढला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना