शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता चार दिवसात झाला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देगोसे पुनर्वसन विभागाचा पुढाकार । बॅक वॉटरने अडला होता रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने गणेशपूर स्मशानभूमी रस्ता पाण्याखाली आला होता. अंत्यसंस्कारासाठी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर गोसे पुनर्वसन विभागाने याची दखल घेतली आणि चार दिवसात हा रस्ता तयार करण्यात आला. यामुळे गणेशपुरच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सदर काम तात्काळ केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला. त्यासाठीच १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. याची दखल घेत गोसे पुनर्वसन विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता अवघ्या चार दिवसात तयार करण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.समस्या मार्गीगोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने शेतशिवाराचे रस्ते बंद झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत गोसे प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढून नवीन रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक