शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अखेर गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता चार दिवसात झाला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देगोसे पुनर्वसन विभागाचा पुढाकार । बॅक वॉटरने अडला होता रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने गणेशपूर स्मशानभूमी रस्ता पाण्याखाली आला होता. अंत्यसंस्कारासाठी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर गोसे पुनर्वसन विभागाने याची दखल घेतली आणि चार दिवसात हा रस्ता तयार करण्यात आला. यामुळे गणेशपुरच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी गोसे पुनर्वसन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सदर काम तात्काळ केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला. त्यासाठीच १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही देण्यात आले. याची दखल घेत गोसे पुनर्वसन विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.गणेशपूर स्मशानभूमीचा रस्ता अवघ्या चार दिवसात तयार करण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.समस्या मार्गीगोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने शेतशिवाराचे रस्ते बंद झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत गोसे प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढून नवीन रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक