शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जीर्ण विश्रामगृहाचे हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:38 IST

गेल्या सहा वर्षापासून बंद असणाऱ्या ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात आ. चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने संजिवनी देण्याचे प्रयत्न सुर झाले आहे. पर्यटन स्थळात असणाºया जिर्ण विश्रामगृहाचे पर्यटन विभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन कोटीतून नव्याने बांधकाम होणार : पर्यटनस्थळात मास्टर प्लानची अमलबजावणी

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : गेल्या सहा वर्षापासून बंद असणाऱ्या ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात आ. चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने संजिवनी देण्याचे प्रयत्न सुर झाले आहे. पर्यटन स्थळात असणाºया जिर्ण विश्रामगृहाचे पर्यटन विभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे. यामुळे पर्यटन स्थळाला अच्छे दिन येणार आहे.भंडारा जिल्ह्यातील एकमेव ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला सन २०१२ पासून उतरती कळा लागली आहे. गेल्या सहा वर्षापासून पर्यटन स्थळ बंद असल्याने पर्यटकांत नाराजीचा सुर आहे. पर्यटन स्थळ बंद होताच अनेक बेरोजगार तरुणांवर उपासमारीची पाळी आली आहे. याशिवाय परिसरात असणाºया व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम झाल्याचे अनुभवास आले आहे.या पर्यटन स्थळात १९०३ मध्ये ब्रिटीश कालीन विश्राम गृहाचे बांधकाम करण्यात आले होते. या विश्रामगृहाचे देखभालीची जबाबदारी स्थानिक पाटबंधारे विभागाचे अखत्यारित होती. या विश्रामगृहाचा ताबा पर्यटन स्थळाचे कंत्राटदाराकडे देण्यात आला होता. पर्यटन स्थळाचा कंत्राट संपताच विश्रामगृहाची नासधुस करण्यात आली आहे. यानंतर पर्यटन स्थळाला बंद करण्यात सहा वर्षाचे कालावधीत नविन निविदा काढण्यात आली नाही. पय्रटन स्थळ सुरु करण्याची ओरड सुरु झाल्याने महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडे ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळाचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हस्तांतरण करण्यात आले. या विभागाने पर्यटन स्थळात सर्वेक्षण केले. परंतु विकासाला गती देण्यात आली नाही. अनेक वर्षाचा कालावधी ओलांडले जात असतांना आ. चरण वाघमारे यांनी पर्यटन स्थळाला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. पर्यटन विभागाला ०.५४ आर जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ३ कोटी रुपयांचे खर्चातून विश्रामगृहाचे बांधकाम होणार आहे. याशिवाय पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी मास्टर प्लान वर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे पर्यटन स्थळात कॉटेज हॉटेल, बोटींग तथा मनोरंजनाची साधने निर्माण केली जाणार आहे. पर्यटन स्थळाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे.पर्यटन विकास सोबत तिर्थस्थळ पॅकेज देण्याची गरज आहे. जागृत हनुमान देवस्थानचा विकास प्रभावित आहे. पर्यटन व तिर्थस्थळ यांच्या संयुक्त विकास झाल्यास चांदपूर गाव आकर्षणाचे केंद्र ठरेल.- उर्मिला लांजे,सरपंच चांदपूर