शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

अखेर मच्छेराचे सरपंच पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:28 IST

याबाबद सविस्तर वृत्त असे की, सिहोरा वरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं मच्छेरा गावाची लोकसंख्या हजारच्या जवळपास आहे. या गावातील ...

याबाबद सविस्तर वृत्त असे की, सिहोरा वरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं मच्छेरा गावाची लोकसंख्या हजारच्या जवळपास आहे. या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संख्या आठ आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत नोकेश्वर पारधी हे निवडून आले होते. मात्र सरपंच यांच्यावर सदस्यांना विश्वासात न घेता मानमर्जीचा कारभार करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत होता. मात्र थेट निवडणुकीच्या शासन निर्णयात अडीच वर्षापर्यन्त सरपंच यांच्यावर अविश्वास घेता येत नसल्यामुळे सदस्य वेळेच्या प्रतीक्षेत होते. अनेक वेळी सरपंच सर्व सदस्य गणसोबत अपमानास्पद वागणूक करतात, ग्रामपंचायतच्या कारभारात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही. या विषयाला धरून सदस्य दीनदयाल टेंभरे, शैलेश शेंडे, प्रमिला कोकुडे, शिंधूबाई उरकुडे, रत्नमाला खानकुरे, आशा गजभिये यांनी दिनांक १२ ऑक्टोबरला तहसीलदार तुमसर यांच्या दालनात तक्रार सादर करण्यात आले. प्रभारी तहसीलदार अशोक पाटील यांनी या विषयावर पत्र काढत १९ ऑक्टोबरच्या दुपारी २.०० वाजता ग्रामपंचायत च्या इमारतीत सरपंचासह सर्व सदस्यांची बैठक बोलावली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या बैठकीत सर्व मुद्यावर चर्चा करून मतदान घेण्यात आले. घेण्यात आलेल्या मतदानात सर्व चे सर्व सात सदस्य, सरपंच नोकेस्वर पारधी यांच्या विरोधात अविश्वास दाखविल्याने शेवटी तहसीलदार यांनी तसा ठराव लिहीत सरपंच यांना पदावरून निरस्त केले होते. तात्पुरता कारभार उपसरपंच दीनदयाल टेंभरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मात्र या निर्णयाविरोधात सरपंच हे अपील मध्ये गेलेले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम २०१७ मधील कलाम ३१ मध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव संदर्भात कलम ३५ मधील पोटकलम १(अ ) अन्वये विशेष ग्रामसभेची आवश्यक आहे. त्यात जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचा आयोजन न झाल्यामुळे सरपंच यांच्या विरुद्ध कलम ३५ नुसार प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे. विशेष ग्रामसभेचे आयोजन जेव्हा पर्यन्त पूर्ण होत नाही तेव्हा पर्यन्त मच्छेरा ग्रामपंचायत सरपंच पदावर नोकेस्वर पारधी राहतील असा आदेश पारीत केल्याने पुन्हा सरपंच यांनी आपली जबादारी स्वीकारली होती. दरम्यान दिनांक २२ डिसेंबरला ग्रामसभेचे आयोजन करण्यासाठी ग्रामपंचायतला पत्र मिळाले. सात दिवसाच्या आधीपासून गावातील नागरिकांना ग्रामसभेत मतदान आपल्या बाजूनेच करावे यासाठी दोन्ही पक्षाकाकडून प्रचंड मेहनत घेण्यात आली. जणू गावांत निवडणुकांचं वातावरण तापविण्यात आले. २२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता तुमसरचे तहसीलदार तेळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन तर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. तर ग्रामसभेत आणि मतदान प्रक्रिया पार पाडत असतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्शवभुमीवर सिहोऱ्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी आपल्या फौजफाट्यासह पोलिसांच्या चोख बंदोबस्त लावलेला होता. मतदान हे तीन वाजे पर्यन्त पार पडले. यात एकूण ४८९ मतदारांनी मतदान केले. आणि लगेच मतमोजणी ला सुरवात करण्यात आली. यात सरपंच नोकेस्वर पारधी यांच्या बाजूने १६३ तर विरोधात ३०१ मतदान पडले. तर २५ मतदान अवैध झाले. १३८ मतांनी सरपंच यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना सरपंच पदाची खुर्ची अखेर सोडावी लागली आहे. उपसरपंच दीनदयाल टेंभरें यांच्या कडे सरपंच पदाची तात्पुरती धुरा देण्यात आली आहे. २४ लोक ०३ के