शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अखेर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ...

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते; मात्र तात्पुरता कोरोना नियंत्रणात आला असल्यामुळे नुकत्याच ९ ते १२ तसेच ५ ते ८वीच्या नियमित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले. कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की नाही. आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही, अशी पालकांची चिंता वाढली होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच केंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सध्या ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गर्दी होणार नाही. यासाठी शाळेतच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्य. शिक्षक संघाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळास्तरावर घेण्याबाबत निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २० मार्च रोजी विद्यार्थ्यांना परीक्षेकारिता अधिक वेळ मिळावा, परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी दहावी बारावीच्या परीक्षा शाळा स्तरावर घेऊन फिजिकल अंतर पाळण्यासाठी आवश्यकता भासल्यास नजीकच्या शाळेच्या वर्ग खोल्या घेण्याची घोषणा घोषणा केली आहे.

राज्य शासनाने विमाशीच्या निवेदनाची दखल घेतल्यामुळे कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, अनिल कापटे, मनोज अंबादे, धनवीर काणेकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम इत्यादींनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचे आभार मानले.

कोट बॉक्स

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळा स्तरावर घेण्याची संघटनेची मागणी होती. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी विमाशीच्या मागणीची दखल घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षकांना परीक्षासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे.

राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह

विमाशि संघ, भंडारा.