शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

प्रकल्पाची अंतिम मान्यता अधांतरी

By admin | Updated: July 14, 2014 23:46 IST

तालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून भिमकलसा प्रकल्पाकडे शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षापासून वाट पाहत आहेत. मात्र राजकीय चढाओढ व शासनाची कासवगती यात या

भिमलकसा प्रकल्प : वनमंत्रालयाकडून अंतिम मान्यता नाहीसंजय साठवणे - साकोलीतालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून भिमकलसा प्रकल्पाकडे शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षापासून वाट पाहत आहेत. मात्र राजकीय चढाओढ व शासनाची कासवगती यात या प्रकल्पाचे ग्रहण अजूनपर्यंत सुटले नाही. विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या मध्यम प्रकल्प उपविभागाने भीमलकसा सिंचन प्रकल्पासाठी वन पर्यावरण विभागाला १४.५ कोटी रूपये भरले. परंतु वन व पर्यावरण विभागाकडून प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे १० टक्के काम पूर्ण झाले नाही. भिमलकसा प्रकल्पाला ८ मे १९७३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाचे काम जोनवारी १९७५ रोजी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले. या प्रकल्पाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित १० टक्के काम वनकायद्यामुळे रखडले आहे. भिमलकसा प्रकल्पाचे क्षेत्र डोंगराळ भागाजवळ व वनक्षेत्राला असून अविकसीत व सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसलेले क्षेत्र आहे. या भागातील शेती नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे.भीमलकसा या सिंचन प्रकल्पासाठी वनविभागाच्या ११६.०३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहन करण्यात आले. या जागेचा मोबदला व खांबा वडेगाव येथील पर्यायी जागा वनविभागाला देण्यात आली. त्यावर वनीकरण करण्यात येणार आहे. वनीकरणासाठी साडेचौदा कोटी रूपये आणि दंडात्मक कारवाई म्हणून ४६ लाख रूपये सिंचन विभागाकडून वन विभागाने वसूल केले. तरीही वन विभागाकडून भिमलकसा प्रकल्पाला अद्याप अंतिम मान्यता मिळाली नाही.या प्रकल्पासाठी शासनाने मागील ३५-४० वर्षापासून सतत कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. १९९० च्या सुमारास या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित १० टक्के काम तसेच रखडले आहे. २००८ ला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी या प्रकल्पाची वनकायद्यातून सुटका केली. तेव्हा हा प्रकल्प लवकरच पुर्णत्वास जाईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र लोकाचा अपेक्षाभंग झाल्या. या प्रकल्पासून २ हजार ७०० एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.तीन महिन्यापूर्वी जलाशयाची पाळ डावा व उजवा कालवा, झळभरणी या कामासाठी पाटबंधारे विभागाने निविदा सुद्धा मागविल्या होत्या. मात्र आचारसंहितेमुळे त्या तशाच पडून राहिल्या. या तलावाची पाळ यापूर्वीच वाहून गेली. त्यात शेतकऱ्यांची वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील व गावातील शेतकरी पाळीवर माती टाकत असतात. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आल्यावर जमनापूर, पाथरी, वडेगाव, खांबा व तुडमापूरी या गावातील शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. शासनाने प्राधान्याने या प्रकल्पाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे व परिसरात हरित क्रांती घडवून आणावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.