शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

प्रकल्पाची अंतिम मान्यता अधांतरी

By admin | Updated: July 14, 2014 23:46 IST

तालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून भिमकलसा प्रकल्पाकडे शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षापासून वाट पाहत आहेत. मात्र राजकीय चढाओढ व शासनाची कासवगती यात या

भिमलकसा प्रकल्प : वनमंत्रालयाकडून अंतिम मान्यता नाहीसंजय साठवणे - साकोलीतालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून भिमकलसा प्रकल्पाकडे शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षापासून वाट पाहत आहेत. मात्र राजकीय चढाओढ व शासनाची कासवगती यात या प्रकल्पाचे ग्रहण अजूनपर्यंत सुटले नाही. विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या मध्यम प्रकल्प उपविभागाने भीमलकसा सिंचन प्रकल्पासाठी वन पर्यावरण विभागाला १४.५ कोटी रूपये भरले. परंतु वन व पर्यावरण विभागाकडून प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे १० टक्के काम पूर्ण झाले नाही. भिमलकसा प्रकल्पाला ८ मे १९७३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाचे काम जोनवारी १९७५ रोजी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले. या प्रकल्पाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित १० टक्के काम वनकायद्यामुळे रखडले आहे. भिमलकसा प्रकल्पाचे क्षेत्र डोंगराळ भागाजवळ व वनक्षेत्राला असून अविकसीत व सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसलेले क्षेत्र आहे. या भागातील शेती नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे.भीमलकसा या सिंचन प्रकल्पासाठी वनविभागाच्या ११६.०३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहन करण्यात आले. या जागेचा मोबदला व खांबा वडेगाव येथील पर्यायी जागा वनविभागाला देण्यात आली. त्यावर वनीकरण करण्यात येणार आहे. वनीकरणासाठी साडेचौदा कोटी रूपये आणि दंडात्मक कारवाई म्हणून ४६ लाख रूपये सिंचन विभागाकडून वन विभागाने वसूल केले. तरीही वन विभागाकडून भिमलकसा प्रकल्पाला अद्याप अंतिम मान्यता मिळाली नाही.या प्रकल्पासाठी शासनाने मागील ३५-४० वर्षापासून सतत कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. १९९० च्या सुमारास या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित १० टक्के काम तसेच रखडले आहे. २००८ ला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी या प्रकल्पाची वनकायद्यातून सुटका केली. तेव्हा हा प्रकल्प लवकरच पुर्णत्वास जाईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र लोकाचा अपेक्षाभंग झाल्या. या प्रकल्पासून २ हजार ७०० एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.तीन महिन्यापूर्वी जलाशयाची पाळ डावा व उजवा कालवा, झळभरणी या कामासाठी पाटबंधारे विभागाने निविदा सुद्धा मागविल्या होत्या. मात्र आचारसंहितेमुळे त्या तशाच पडून राहिल्या. या तलावाची पाळ यापूर्वीच वाहून गेली. त्यात शेतकऱ्यांची वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील व गावातील शेतकरी पाळीवर माती टाकत असतात. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आल्यावर जमनापूर, पाथरी, वडेगाव, खांबा व तुडमापूरी या गावातील शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. शासनाने प्राधान्याने या प्रकल्पाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे व परिसरात हरित क्रांती घडवून आणावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.