शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाणीपट्टी भरा, उपसा सिंचनचे पाणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे ...

अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट अक्षरात गावागावातील चौकाचौकात पॉम्प्लेट लावण्यात आले आहेत. पाणी कर भरा अन्‌ उपसा सिंचनाचे पाणी घ्या, अशी बळीराजाला संकटात घालणारी बाब समोर आली आहे.

पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन यासाठी सुरू होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आधीच पाण्याची पातळी योग्य प्रमाणात करून ठेवली असल्याची माहिती आहे.

मागील गुरुवारी आलेल्या पावसामुळे कसे तरी पऱ्हे जगताहेत; पण जोपर्यंत रोवणी करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पीकही येणार नाहीत. अशा बिकट परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कुठलीही पर्वा न करता असलेली पाणीपट्टी भरली; पण आता बाकीचे शेतकरी पाणीपट्टी जर भरत नसतील तर ही चूक कुणाची? ज्यांनी पाणीपट्टी तात्काळ भरली ते मूर्ख आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. यावर संबंधित विभागाने विचार करण्याची गरज आहे.

मागील चार वर्षांचा इतिहास नेरला उपसा सिंचन योजनेचा बघितला तर बळीराजाला या सिंचन योजनेमुळे लाभच होत गेला. यात काही शंका नाही; पण नेहमीच शेतकरी का फसतो, का अडकतो, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांना पाणी कर भरल्याशिवाय शेतीला पाणी मिळणार नाही, असे कळताच काही शेतकऱ्यांनी तात्काळ पैसे भरले; पण आजही असंख्य शेतकऱ्यांनी पाणी कर भरला नाही. यामुळे जणू कर भरला तेही अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. ६३० रुपये हेक्टर जर पकडले तर जास्तीत जास्त २५० रुपये प्रतिएकर भरायचे आहेत. याचाही विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, असेही बोलल्या जात आहे.