शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पाणीपट्टी भरा, उपसा सिंचनचे पाणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे ...

अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट अक्षरात गावागावातील चौकाचौकात पॉम्प्लेट लावण्यात आले आहेत. पाणी कर भरा अन्‌ उपसा सिंचनाचे पाणी घ्या, अशी बळीराजाला संकटात घालणारी बाब समोर आली आहे.

पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन यासाठी सुरू होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आधीच पाण्याची पातळी योग्य प्रमाणात करून ठेवली असल्याची माहिती आहे.

मागील गुरुवारी आलेल्या पावसामुळे कसे तरी पऱ्हे जगताहेत; पण जोपर्यंत रोवणी करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पीकही येणार नाहीत. अशा बिकट परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कुठलीही पर्वा न करता असलेली पाणीपट्टी भरली; पण आता बाकीचे शेतकरी पाणीपट्टी जर भरत नसतील तर ही चूक कुणाची? ज्यांनी पाणीपट्टी तात्काळ भरली ते मूर्ख आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. यावर संबंधित विभागाने विचार करण्याची गरज आहे.

मागील चार वर्षांचा इतिहास नेरला उपसा सिंचन योजनेचा बघितला तर बळीराजाला या सिंचन योजनेमुळे लाभच होत गेला. यात काही शंका नाही; पण नेहमीच शेतकरी का फसतो, का अडकतो, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांना पाणी कर भरल्याशिवाय शेतीला पाणी मिळणार नाही, असे कळताच काही शेतकऱ्यांनी तात्काळ पैसे भरले; पण आजही असंख्य शेतकऱ्यांनी पाणी कर भरला नाही. यामुळे जणू कर भरला तेही अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. ६३० रुपये हेक्टर जर पकडले तर जास्तीत जास्त २५० रुपये प्रतिएकर भरायचे आहेत. याचाही विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, असेही बोलल्या जात आहे.