शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

पाणीपट्टी भरा, उपसा सिंचनचे पाणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे ...

अडयाळ : दोन वर्षांत मिळालेल्या पाण्याचा पाणी कर जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत नेरला उपसा सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट अक्षरात गावागावातील चौकाचौकात पॉम्प्लेट लावण्यात आले आहेत. पाणी कर भरा अन्‌ उपसा सिंचनाचे पाणी घ्या, अशी बळीराजाला संकटात घालणारी बाब समोर आली आहे.

पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन यासाठी सुरू होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आधीच पाण्याची पातळी योग्य प्रमाणात करून ठेवली असल्याची माहिती आहे.

मागील गुरुवारी आलेल्या पावसामुळे कसे तरी पऱ्हे जगताहेत; पण जोपर्यंत रोवणी करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पीकही येणार नाहीत. अशा बिकट परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कुठलीही पर्वा न करता असलेली पाणीपट्टी भरली; पण आता बाकीचे शेतकरी पाणीपट्टी जर भरत नसतील तर ही चूक कुणाची? ज्यांनी पाणीपट्टी तात्काळ भरली ते मूर्ख आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. यावर संबंधित विभागाने विचार करण्याची गरज आहे.

मागील चार वर्षांचा इतिहास नेरला उपसा सिंचन योजनेचा बघितला तर बळीराजाला या सिंचन योजनेमुळे लाभच होत गेला. यात काही शंका नाही; पण नेहमीच शेतकरी का फसतो, का अडकतो, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांना पाणी कर भरल्याशिवाय शेतीला पाणी मिळणार नाही, असे कळताच काही शेतकऱ्यांनी तात्काळ पैसे भरले; पण आजही असंख्य शेतकऱ्यांनी पाणी कर भरला नाही. यामुळे जणू कर भरला तेही अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. ६३० रुपये हेक्टर जर पकडले तर जास्तीत जास्त २५० रुपये प्रतिएकर भरायचे आहेत. याचाही विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, असेही बोलल्या जात आहे.