शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

साकोलीत पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरु

By admin | Updated: February 28, 2017 00:24 IST

कृषीपंपाचे भारनियमन बंद करुन २४ तास विद्युतपुरवठा सुरु राहावा तसेच धानाला तीन हजार पाचशे रुपये भाव मिळावा...

प्रशासनाचे दुर्लक्ष : उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलीसाकोली : कृषीपंपाचे भारनियमन बंद करुन २४ तास विद्युतपुरवठा सुरु राहावा तसेच धानाला तीन हजार पाचशे रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांना घेऊन साकोली येथे मागील पाच दिवसापासुन शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष असुन आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत आहे.सततची नापिकी व वाढते कर्जाचे डोंगर यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. एकीकडे एकीकडे निसर्गाची अवकृपा, दुसरीकडे सिंचनाची अपुरी सोय यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची कशी असा पेच शेतकऱ्यांसमोर पडला आहे. पावसाळ्यात उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची भरपाई उन्हाळ्यात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र फक्त ८ तासाच्या विज पुरवठ्यामुळे उन्हाळी धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे हे भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे. यासाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समिती साकोलीतर्फे पाच दिवसापासुन विज वितरण कपंनी कार्यालयासमोर महिला व पुरुष शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही. परिणामी काल दुपारी आंदोलनकांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तीन आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरीचे आंदोलन केले होते. दरम्यान, पाचव्या दिवशी आमदार बाळा काशीवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व उपोषण कर्त्याशी चर्चा करुन समस्या जाणुन घेतल्या व भारनियमनाबाबद उद्या २८ ला मुंबईला मुख्यमंत्री फडणवीस यांचेशी चर्चा करुन भारनियमन कमी करण्याचा प्रयत्न करु असे सांगितले यावेळी उपोषणकर्ते शाम महाजन, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. अजय तुमसरे, खोटेले व शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)