शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

शेतकरी संघटनेच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:07 IST

येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही लोकप्रतिनीधी व निष्ठुर प्रशासनाला जाग येत नाही.

ठळक मुद्देनिष्ठुर प्रशासनाला पाझर फुटेना : कडाक्याच्या थंडीत उपोषणकर्ते काढताहेत रात्र

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही लोकप्रतिनीधी व निष्ठुर प्रशासनाला जाग येत नाही.मागील पाच दिवसापुर्वी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश व छत्तीसगढ प्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला अडीच हजार रुपए हमीभाव द्यावा अथवा ७५० रुपये बोनस जाहीर करावे. तसेच महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायतीमध्ये बंद असलेली रोजगार हमी योंजनेची कामे पुर्ववत करावी या मागण्यांसाठी २८ जानेवारीला गांधी चौक लाखांदुर ते तहसील कार्यालयापर्यत १० हजार शेतकरी, शेतमजूरांच्या संख्येने महामोर्चा निघाला होता. मोर्चा आटपल्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी, शेतमजूर महिलावगार्ने नविन बस स्टाँप समोरील कृषी प्रदर्शनीच्या मैदानावर आमरण उपोषण चालू केले असून, आजमितीला या उपोषण आंदोलणाचा सहावा दिवस आहे.गेल्या आठवड्यात अवकाली पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशाही स्थितीत जवळपास दोनसे महिला, पुरूष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही प्रशासन व लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष वेधले नाही.दरम्यान २८ जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन शासन दरबारी पाठपुरवा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ताधारी पक्षाच्या अजुन एकाही लोकप्रतिनीधींनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही.उपोषणकर्त्यांच्या जोपर्यंत प्रशासनाचे लोकप्रतिनीधी येऊन आम्हच्या मागण्या पुर्ण करत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर शनिवारपर्यत (ता.२) मागण्या मंजूर न केल्यास लोकप्रतिनीधींच्या विरोधात धिक्कार मोर्चा व रास्ता रोको आंदोलणाचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे.