शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

खत लिंकिंग प्रकरण पोहोचले कृषी आयुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता तालुक्यात घेणार नाही व ते विकणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. कृषी केंद्र संचालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाचा फायदा उचलत रासायनिक खत कंपन्यांनी साधारण खतासोबत मागणी नसलेल्या खतांचीही लिंकिंग मोठ्या प्रमाणात केली. सव्वा लाखाच्या खतासोबत सहा लाखांची खते लिंकिंग म्हणून पाठवण्यात आली. हे प्रकरण चांगलेच गाजत असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस जारी केल्यानंतर आता थेट राज्याच्या कृषी आयुक्तांनाही चौकशीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे.यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. परिणामी रासायनिक खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपनीच्या अडचणीत अधिकच वाढ होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे लाखांदूर ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचे खत यानंतर लाखांदूर तालुक्यात आम्ही घेणार नाहीत, असा प्रस्ताव घेत निर्णयही घेतला आहे. रासायनिक खत कंपन्या यावर्षीही मुख्य खतासोबत अन्य खत लिंकिंग करीत आहेत. दहा दिवसांपूर्वीच कोरोमंडल इंटरनॅशनल या खत कंपनीचे दोन रॅक आले होते. त्यात डीएपी खताची मात्रा अधिक होती. सोबतच लिंकिंगचे खत घेणेही शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा ऍग्रो असोसिएशनने पुढाकार घेत या जुलमी खत लिंकिंगची तक्रार केली होती. शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने ते अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता तालुक्यात घेणार नाही व ते विकणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. कृषी केंद्र संचालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. 

आयुक्त कारवाई करणार काय?

- राज्याचे शिक्षण आयुक्त काम सांभाळलेल्या धीरज कुमार हे सध्या कृषी विभागाचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहत आहेत. परखड निर्णय घेण्यात ते अग्रेसर असून रासायनिक खताच्या लिंकिंगवरही ते योग्य व सत्य निर्णय देतील, अशी आशाही शेतकरी बाळगून आहेत. कृषी आयुक्तांकडे थेट तक्रारी झाल्याने रासायनिक खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपनीची आता खैर नाही, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती