शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

खत लिंकिंग प्रकरण पोहोचले कृषी आयुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता तालुक्यात घेणार नाही व ते विकणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. कृषी केंद्र संचालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाचा फायदा उचलत रासायनिक खत कंपन्यांनी साधारण खतासोबत मागणी नसलेल्या खतांचीही लिंकिंग मोठ्या प्रमाणात केली. सव्वा लाखाच्या खतासोबत सहा लाखांची खते लिंकिंग म्हणून पाठवण्यात आली. हे प्रकरण चांगलेच गाजत असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस जारी केल्यानंतर आता थेट राज्याच्या कृषी आयुक्तांनाही चौकशीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे.यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. परिणामी रासायनिक खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपनीच्या अडचणीत अधिकच वाढ होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे लाखांदूर ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचे खत यानंतर लाखांदूर तालुक्यात आम्ही घेणार नाहीत, असा प्रस्ताव घेत निर्णयही घेतला आहे. रासायनिक खत कंपन्या यावर्षीही मुख्य खतासोबत अन्य खत लिंकिंग करीत आहेत. दहा दिवसांपूर्वीच कोरोमंडल इंटरनॅशनल या खत कंपनीचे दोन रॅक आले होते. त्यात डीएपी खताची मात्रा अधिक होती. सोबतच लिंकिंगचे खत घेणेही शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा ऍग्रो असोसिएशनने पुढाकार घेत या जुलमी खत लिंकिंगची तक्रार केली होती. शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने ते अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता तालुक्यात घेणार नाही व ते विकणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. कृषी केंद्र संचालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. 

आयुक्त कारवाई करणार काय?

- राज्याचे शिक्षण आयुक्त काम सांभाळलेल्या धीरज कुमार हे सध्या कृषी विभागाचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहत आहेत. परखड निर्णय घेण्यात ते अग्रेसर असून रासायनिक खताच्या लिंकिंगवरही ते योग्य व सत्य निर्णय देतील, अशी आशाही शेतकरी बाळगून आहेत. कृषी आयुक्तांकडे थेट तक्रारी झाल्याने रासायनिक खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपनीची आता खैर नाही, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती