शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने महिलेला चिरडले

By admin | Updated: June 1, 2017 00:25 IST

दुचाकीने पत्नीला घेऊन कोंढा येथे जाणाऱ्या एका इसमाच्या वाहनाला विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पती गंभीररित्या जखमी : सिंदपुरी फाट्यावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कपवनी : दुचाकीने पत्नीला घेऊन कोंढा येथे जाणाऱ्या एका इसमाच्या वाहनाला विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पती गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना बुधवारला सायंकाळी ५.३० वाजता भंडारा-पवनी राज्य मार्गावरील सिंदपुरी फाट्यावर घडली.कामाक्षीअम्मा रामसागर (५०) रा.कोंढा (कोसरा) असे मृत महिलेचे नाव आहे. रामालू रामसागर हे दुचाकी क्रमांक एमएच२७ /एजी ४१३३ ने पत्नीसह कुर्झा-गोसेबुज मार्गाने कोंढा येथे जात होते. दरम्यान सिंदपुरी फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या धानाची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एमएच ३१ /सीक्यु ८७७४ ने रामसागर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रामालू हे रस्त्याच्या बाजूला तर कामाक्षीअम्मा रामसागर या ट्रकच्या मागील चाकात दबल्या गेल्या. ट्रकचे चाक पोटावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचे पती रामालू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पवनी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरु आहे. सायंकाळपर्यंत वाहनचालक पोलिसांच्या हातात लागलेला नव्हता.रेतीची जड वाहतूक सुरूचपवनी शहरातील मुख्य चौकातून दररोज जड वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रेती तस्करांच्या प्राबल्यामुळे जड वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. पवनी तालुक्यातील रेती घाटांमधून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून ही रेती नागपुरला नेली जात आहे. या जड वाहनांच्या भरधाव वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे याचा फटका रस्त्यांनाही बसत आहे. रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. तरीही याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष गेलेले नाही.कुर्झा - गोसे हा मार्ग अरुंद असून सखल आहे. परिणामी विरुद्ध दिशेने येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. या वळणावर तसेच फाट्यावरही ही स्थिती असल्याने दिवसेंगणिक अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.