शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भूतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:13 IST

कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले कलंक पुसून काढता येते.

ठळक मुद्देमनीष गोस्वामी : जिल्हा कारागृहात मन परिवर्तन सभा, ३५० बंदींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले कलंक पुसून काढता येते. त्यामुळे भुतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करण्यासाठी मन परिवर्तन करण्याचे आवाहन मनिष गोस्वामी यांनी केले.भंडारा जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी मन परिवर्तनाचा कार्यक्रम शनिवारला घेण्यात आला. यावेळी सभेला ३५० कैद्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील युनिव्हर्सल हायस्कूलच्या प्राचार्या एम.एस. साईजन होत्या. यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक अमृत आगाशे, पोलीस उपनिरीक्षक आर.डी. मेगडे, क्षीरसागर, राजेश निशाद आदी उपस्थित होते.गोस्वामी म्हणाले, कैदी हा जन्मत: गुन्हेगार नाही. परंतु त्यांनी जो गुन्हा केला तो गुन्हा कबूल करा, खरा पश्चाताप करा, यापुढे गुन्हा न करण्याचा निर्णय घ्या, वाईट संगतीमुळे व दारूच्या व्यसनामुळे अधिकाअधिक गुन्हे घडतात. अतुट निर्णय घेवून वाईट काम टाळण्यासाठी स्वत:चे मनपरिवर्तन करा, असे आवाहन केले.प्राचार्य एम.एस. साईजन म्हणाल्या, मागील केलेले हे कृत्य वाईट होते. त्याला अपघात समजून जीवन येथे संपला असे नाही. कारागृह म्हणजे 'रिपेरिंग सेंटर' आहे. चुका दुरूस्त करून आदर्श बनायचे आहे. कोणत्याही व्यक्तीवर आपत्ती येवू शकते. त्यामुळे आतापासून मन परिवर्तन करणे काळाची गरजेचे आहे.याप्रसंगी अतिथींच्या हस्ते कैद्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कैद्यांनी आपल्या व्यथा उपस्थित अतिथींजवळ व्यक्त करून ढसाढसा रडू लागले.