शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

भूतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:13 IST

कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले कलंक पुसून काढता येते.

ठळक मुद्देमनीष गोस्वामी : जिल्हा कारागृहात मन परिवर्तन सभा, ३५० बंदींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले कलंक पुसून काढता येते. त्यामुळे भुतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करण्यासाठी मन परिवर्तन करण्याचे आवाहन मनिष गोस्वामी यांनी केले.भंडारा जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी मन परिवर्तनाचा कार्यक्रम शनिवारला घेण्यात आला. यावेळी सभेला ३५० कैद्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील युनिव्हर्सल हायस्कूलच्या प्राचार्या एम.एस. साईजन होत्या. यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक अमृत आगाशे, पोलीस उपनिरीक्षक आर.डी. मेगडे, क्षीरसागर, राजेश निशाद आदी उपस्थित होते.गोस्वामी म्हणाले, कैदी हा जन्मत: गुन्हेगार नाही. परंतु त्यांनी जो गुन्हा केला तो गुन्हा कबूल करा, खरा पश्चाताप करा, यापुढे गुन्हा न करण्याचा निर्णय घ्या, वाईट संगतीमुळे व दारूच्या व्यसनामुळे अधिकाअधिक गुन्हे घडतात. अतुट निर्णय घेवून वाईट काम टाळण्यासाठी स्वत:चे मनपरिवर्तन करा, असे आवाहन केले.प्राचार्य एम.एस. साईजन म्हणाल्या, मागील केलेले हे कृत्य वाईट होते. त्याला अपघात समजून जीवन येथे संपला असे नाही. कारागृह म्हणजे 'रिपेरिंग सेंटर' आहे. चुका दुरूस्त करून आदर्श बनायचे आहे. कोणत्याही व्यक्तीवर आपत्ती येवू शकते. त्यामुळे आतापासून मन परिवर्तन करणे काळाची गरजेचे आहे.याप्रसंगी अतिथींच्या हस्ते कैद्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कैद्यांनी आपल्या व्यथा उपस्थित अतिथींजवळ व्यक्त करून ढसाढसा रडू लागले.