शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मानवनिर्मित टेकड्यांमुळे दोन गावे गडप होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

मोहन भोयर तुमसर : तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. येथे जगप्रसिद्ध खुली मॅगनीज खान आहे. मॅगनीज उत्खनना दरम्यान खाणीतून लहान-मोठे ...

मोहन भोयर

तुमसर : तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. येथे जगप्रसिद्ध खुली मॅगनीज खान आहे. मॅगनीज उत्खनना दरम्यान खाणीतून लहान-मोठे दगड व मातीचा मलबा मोठ्या प्रमाणात निघतो. सदर दगड व मलब्याचा साठा खाणीपासून काही अंतरावर करण्यात येतो. या मलब्याचे मोठ्या टेकड्यांत रूपांतर झाले आहे. खाणीशेजारील बाळापूर व कुरमुडा गावांना मानवनिर्मित टेकड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात भूस्खलन होऊन दोन्ही गावे गडप होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

डोंगरी बुद्रुक येथे ब्रिटिशकालीन जगप्रसिद्ध मॅगनीज खान आहे. ब्रिटिशांनी या खाणीचा शोध लावला होता. घनदाट जंगलात हा संपूर्ण परिसर आहे. जगात अतिशय उच्च दर्जाचे मॅगनीज येथील भूगर्भात मिळते.

सध्या सदर खाणी भारत सरकारच्या अंतर्गत येतात. येथील खाण ही ओपन कास्ट आहे. खाणीतून मॅग्नेट काढतानाच्या सोबत लहानमोठे दगड व मलबा मोठ्या प्रमाणात निघतो. खाण प्रशासनाने सदर मलब्याची विल्हेवाट खाणीपासून काही अंतरावर केली आहे. मागील अनेक वर्षापासून हा मलबा घालणे सुरू आहे त्यामुळे खान परिसरात मानवनिर्मित टेकड्या तयार झाल्या आहेत. शेजारी बाळापूर व कुरमुडा ही गावे आहेत. सदर टेकड्या या गावाच्या जवळपर्यंत आलेल्या आहेत. टेकडीच्या खाली गावे असल्याने पावसाळ्यात भूस्खलन होऊन ही गावे गडप होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टेकड्यांची उंची मोठी : डोंगरी येथील मॅगनीज खाणीतून निघणारे दगड व मलबा मोठ्या प्रमाणात निघत आहे. सदर मलबा घालून घालून त्यांना टेकड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. टेकड्यांची उंची मोठी झाल्यानंतरही सदर मलबा इतर ठिकाणी घालण्यात येत नाही. त्यामुळे हा मलबा भूस्खलनाचा धोका येथे वाढला आहे. कोट्यवधींचा नफा देणारी ही मॅगनीज खाण असून जगात या खाणीचा पहिल्या दहा खाणींत समावेश होतो, हे विशेष.

चांदमारा येथे खाण वसाहत : खाणीशेजारी असलेल्या बाळापूर या गावात खाणीतील कर्मचाऱ्यांच्या सदनिका होत्या. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी

चांदमारा रस्त्यावर कर्मचाऱ्यांकरिता सदनिका तयार करण्यात आल्या. या वसाहतीत सध्या खाणीतील कर्मचारी राहतात. परंतु बाळापूर येथील गावातील नागरिक आपल्याच घरात वास्तव्याला आहेत. त्यांनी गाव सोडायचा विचार केला तर नवीन घरे बांधण्याकरिता पैसा कोण देईल, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे जागेचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाईलाजाने गावातच वास्तव्य करावे लागत आहे.

प्रशासनाने दखल घ्यावी : बाळापूर व कुरमुडा गावाशेजारी मानवनिर्मित टेकड्या तयार झाल्या. टेकड्यांमुळे गावाला येथे धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधींचा नफा कमावणाऱ्या मॅगनीज खाणींमुळे गावातील नागरिकांना धोक्याची शक्यता आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाने संबंधित गावांचा सर्व्हे करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. मानवनिर्मित टेकड्यांची उंची येथे निश्चित करण्याची गरज आहे. खाण प्रशासनाने नवीन जागेचा शोध घेऊन तिथे मलबा व दगड टाकण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने देण्याची गरज आहे.