शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:36 IST

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.

ठळक मुद्देपंप न वापरणाऱ्यांनाही बिले : ४० वर्षांपासून डागडुजी झालीच नाही

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.आष्टी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पाथरी, कवलेवाडा, पौनारखानी, चांदमारा, गणेशपूर, घानोळ, सुंदरटोला आदी गावांचा समावेश होतो. सदर गावे ही नदीकाठची गावे असून बहुतांश शेतकरी विहीरीवर कृषीपंपाद्वारे शेतीला सिंचन करतात. हांगामी धानपिक घेणारे शेतकरी कृषीपंपाचा उपयोग करीत नाही परंतू सर्वांकडे विद्युत मीटर असून त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. विद्युत मीटर ‘फाल्टी’ असल्यामुळे महावितरण विभागाचे समप्रमाणात विद्युत बिले येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत आहे. आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात ४० वर्षापुर्वी टाकण्यात आलेले विद्युत तारे आजतागायत बदलण्यात आलेले नाही. किंवा त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.परिणामी या क्षेत्रात कधीही वादळीवारा किंवा अतिउष्णतेमुळे त्या विद्युत तारा तुटत असल्याने विद्युत तारांनीही आता प्राण सोडले असल्याचे दिसून येत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा, दवाखाने, राईस मिल, व्यापारी संस्थाने व शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्यात परंतु याकडे अधिकाºयांनीही लक्ष दिले नाही.भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या किमान मुलभूत गरजांकडे जातीने लक्ष घालून शेतकºयांच्या जीवण मरणाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.या क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून अनेकदा महावितरणला तक्रारी केल्या परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे आता थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली आहे.- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य आष्टीराज्य शासनाने अधिकाऱ्यांना मोकाट सोडले म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांना असे दिवस पाहावे लागत आहे.-संगिता मुंगूसमारे, जि.प. सदस्या आष्टी.