शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:36 IST

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.

ठळक मुद्देपंप न वापरणाऱ्यांनाही बिले : ४० वर्षांपासून डागडुजी झालीच नाही

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.आष्टी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पाथरी, कवलेवाडा, पौनारखानी, चांदमारा, गणेशपूर, घानोळ, सुंदरटोला आदी गावांचा समावेश होतो. सदर गावे ही नदीकाठची गावे असून बहुतांश शेतकरी विहीरीवर कृषीपंपाद्वारे शेतीला सिंचन करतात. हांगामी धानपिक घेणारे शेतकरी कृषीपंपाचा उपयोग करीत नाही परंतू सर्वांकडे विद्युत मीटर असून त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. विद्युत मीटर ‘फाल्टी’ असल्यामुळे महावितरण विभागाचे समप्रमाणात विद्युत बिले येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत आहे. आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात ४० वर्षापुर्वी टाकण्यात आलेले विद्युत तारे आजतागायत बदलण्यात आलेले नाही. किंवा त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.परिणामी या क्षेत्रात कधीही वादळीवारा किंवा अतिउष्णतेमुळे त्या विद्युत तारा तुटत असल्याने विद्युत तारांनीही आता प्राण सोडले असल्याचे दिसून येत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा, दवाखाने, राईस मिल, व्यापारी संस्थाने व शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्यात परंतु याकडे अधिकाºयांनीही लक्ष दिले नाही.भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या किमान मुलभूत गरजांकडे जातीने लक्ष घालून शेतकºयांच्या जीवण मरणाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.या क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून अनेकदा महावितरणला तक्रारी केल्या परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे आता थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली आहे.- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य आष्टीराज्य शासनाने अधिकाऱ्यांना मोकाट सोडले म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांना असे दिवस पाहावे लागत आहे.-संगिता मुंगूसमारे, जि.प. सदस्या आष्टी.