शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:36 IST

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.

ठळक मुद्देपंप न वापरणाऱ्यांनाही बिले : ४० वर्षांपासून डागडुजी झालीच नाही

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.आष्टी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पाथरी, कवलेवाडा, पौनारखानी, चांदमारा, गणेशपूर, घानोळ, सुंदरटोला आदी गावांचा समावेश होतो. सदर गावे ही नदीकाठची गावे असून बहुतांश शेतकरी विहीरीवर कृषीपंपाद्वारे शेतीला सिंचन करतात. हांगामी धानपिक घेणारे शेतकरी कृषीपंपाचा उपयोग करीत नाही परंतू सर्वांकडे विद्युत मीटर असून त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. विद्युत मीटर ‘फाल्टी’ असल्यामुळे महावितरण विभागाचे समप्रमाणात विद्युत बिले येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत आहे. आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात ४० वर्षापुर्वी टाकण्यात आलेले विद्युत तारे आजतागायत बदलण्यात आलेले नाही. किंवा त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.परिणामी या क्षेत्रात कधीही वादळीवारा किंवा अतिउष्णतेमुळे त्या विद्युत तारा तुटत असल्याने विद्युत तारांनीही आता प्राण सोडले असल्याचे दिसून येत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा, दवाखाने, राईस मिल, व्यापारी संस्थाने व शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्यात परंतु याकडे अधिकाºयांनीही लक्ष दिले नाही.भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या किमान मुलभूत गरजांकडे जातीने लक्ष घालून शेतकºयांच्या जीवण मरणाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.या क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून अनेकदा महावितरणला तक्रारी केल्या परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे आता थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली आहे.- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य आष्टीराज्य शासनाने अधिकाऱ्यांना मोकाट सोडले म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांना असे दिवस पाहावे लागत आहे.-संगिता मुंगूसमारे, जि.प. सदस्या आष्टी.