शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

जीवघेणे ठरते आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: February 7, 2015 23:17 IST

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे

उड्डाणपुलाचे काम थंडबस्त्यात : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची फरफट सुरूचतथागत मेश्राम - वरठीभंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे २४ तासात २० वेळा रेल्वे फाटक बंद राहते. उड्डाणपूल नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाची हेकेखोरी व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षतेमुळे उड्डाणपुलाचे काम थंडवस्त्यात आहे. सदर रेल्वे फाटक ग्रामस्थ व विद्यार्थ्यासाठी जीवघेणा ठरत आहे.रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले आहे. दररोज शेकडो विद्यार्थी व गावकरी एका बाजुने दुसरीकडे ये-जा करतात. गावाच्या सिमेपासून ते शेवटच्या टोकापर्यंत रेल्वे स्थानक विस्तारलेले आहे. भंडारा-तुमसर राज्यमार्ग रेल्वे फाटकाला ओलांडून जातो. वरठी व परिसरातील इतर गावातील लोक या रस्त्यांचा वापर करतात. दिवसेंदिवस या मार्गावरून ये-जा करणाऱ्याची संख्या वाढत आहे. त्यानुसार रेल्वे गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २४ तास रेल्वे गाड्या धावले. यामुळे जास्तीत जास्त काळ ही फाटक बंद राहते.एकदा फाटक बंद झाली की किमान १५ ते २० मिनिटे उघडत नाही. कधी कधी एकाचवेळी अपडाऊन या दोन्ही मार्गावरून रेल्वे गाड्या पाठोपाठ धावतात. त्यामुळे पुन्हा फाटक बंद राहण्याचा वेळ वाढतो. मालवाहतुक गाड्यांना पुढील प्रवासासाठी सिग्नल न मिळाल्यास तासनतास रेल्वे रूळावर उभ्या राहतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. एकदा फाटक बंद झाल्यावर फाटकाच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या रांगा लागतात. फाटक उघडताच धावपळ सुरू होते. फाटक बंद होण्यापुर्वी निघण्याच्या नादात एकमेकावर आदळतात. या रेल्वे फाटकावर ये-जा करण्याकरीता उड्डाणपुलाची गरज आहे. धावपळीत रेल्वे रूळ ओलांडताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. रेल्वे प्लॉटफार्मची उंची चढून जाण्याकरीता मुलींना त्रास होतो. रेल्वे फाटक बंद झाल्यावर उघडण्यासाठी लागणाऱ्या वेळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेवून रेल्वेरूळ ओलांडतात. रूळाच्या मध्यभागी रेल्वे उभी राहिल्यास विद्यार्थ्यांना मार्ग नसल्यामुळे रेल्वेच्या चाकातून मार्ग शोधून ये-जा करावे लागते. या भानगडीत गाडी मधेच सुटली की त्यांचा जीव जाण्याची भिती राहते. परंतु पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वरठीवासीयांना यातना भोगाव्या लागत आहेत.