शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणे ठरते आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: February 7, 2015 23:17 IST

भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे

उड्डाणपुलाचे काम थंडबस्त्यात : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची फरफट सुरूचतथागत मेश्राम - वरठीभंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे २४ तासात २० वेळा रेल्वे फाटक बंद राहते. उड्डाणपूल नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाची हेकेखोरी व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षतेमुळे उड्डाणपुलाचे काम थंडवस्त्यात आहे. सदर रेल्वे फाटक ग्रामस्थ व विद्यार्थ्यासाठी जीवघेणा ठरत आहे.रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले आहे. दररोज शेकडो विद्यार्थी व गावकरी एका बाजुने दुसरीकडे ये-जा करतात. गावाच्या सिमेपासून ते शेवटच्या टोकापर्यंत रेल्वे स्थानक विस्तारलेले आहे. भंडारा-तुमसर राज्यमार्ग रेल्वे फाटकाला ओलांडून जातो. वरठी व परिसरातील इतर गावातील लोक या रस्त्यांचा वापर करतात. दिवसेंदिवस या मार्गावरून ये-जा करणाऱ्याची संख्या वाढत आहे. त्यानुसार रेल्वे गाड्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २४ तास रेल्वे गाड्या धावले. यामुळे जास्तीत जास्त काळ ही फाटक बंद राहते.एकदा फाटक बंद झाली की किमान १५ ते २० मिनिटे उघडत नाही. कधी कधी एकाचवेळी अपडाऊन या दोन्ही मार्गावरून रेल्वे गाड्या पाठोपाठ धावतात. त्यामुळे पुन्हा फाटक बंद राहण्याचा वेळ वाढतो. मालवाहतुक गाड्यांना पुढील प्रवासासाठी सिग्नल न मिळाल्यास तासनतास रेल्वे रूळावर उभ्या राहतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. एकदा फाटक बंद झाल्यावर फाटकाच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या रांगा लागतात. फाटक उघडताच धावपळ सुरू होते. फाटक बंद होण्यापुर्वी निघण्याच्या नादात एकमेकावर आदळतात. या रेल्वे फाटकावर ये-जा करण्याकरीता उड्डाणपुलाची गरज आहे. धावपळीत रेल्वे रूळ ओलांडताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. रेल्वे प्लॉटफार्मची उंची चढून जाण्याकरीता मुलींना त्रास होतो. रेल्वे फाटक बंद झाल्यावर उघडण्यासाठी लागणाऱ्या वेळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेवून रेल्वेरूळ ओलांडतात. रूळाच्या मध्यभागी रेल्वे उभी राहिल्यास विद्यार्थ्यांना मार्ग नसल्यामुळे रेल्वेच्या चाकातून मार्ग शोधून ये-जा करावे लागते. या भानगडीत गाडी मधेच सुटली की त्यांचा जीव जाण्याची भिती राहते. परंतु पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वरठीवासीयांना यातना भोगाव्या लागत आहेत.