शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ंवरठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: September 3, 2015 00:22 IST

किमान वेतन व राहणीमान भत्ता ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लागू करावा या मागणीसाठी १९ आॅगस्ट पासून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू होते.

१९ कर्मचारी सहभागी : वेतनवाढ, भत्ते देण्याची मागणी वरठी : किमान वेतन व राहणीमान भत्ता ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लागू करावा या मागणीसाठी १९ आॅगस्ट पासून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू होते. उपोषण करूनही मागणी पूर्ण न झाल्यामुळे १ सप्टेंबर पासून सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा दुसरा दिवस असून यात ग्राम पंचायतच्या २२ स्थायी कर्मचाऱ्यापैकी १९ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.केंद्र सरकारच्या किमान वेतन अधिनियम १९४८ व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि शासन निर्णयनुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा लागू आहे. यानुसार ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सुधारित भत्ते यासह सर्व सुविधा पुरवण्याचे काम संबंधित योजना राबवणाऱ्या यंत्रणेची आहे. ८ जुलै २०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे आकृतीबंध आराखड्यानुसार मंजुर पदावर फक्त ३५ टक्के खर्चाची मर्यादा आहे. पण ग्राम पंचायत स्तरावर कार्यरत इतर कर्मचाऱ्यासाठी नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.ग्रामपंचायत वरठी येथे एकूण ३७ स्थायी कर्मचारी आहेत. शासनाच्या आकृतीबंध आराखड्यानुसार ६ कर्मचाऱ्याची नियुक्ती ग्रामपंचायतला करायची होती. वेळोवेळी बदलेले ग्राम पंचायतचे सरकारने आपआपल्या सोयीने कर्मचाऱ्याची भर्ती करून ६ कर्मचाऱ्याची संख्या ३७ वर नेली. सध्या स्थितीत ग्राम पंचायतच्या ६ कर्मचाऱ्यांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात येत आहे. यापैकी ४ कर्मचारी सद्यस्थितीत कामावर असून २ कर्मचारी निलंबित आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे यासाठी संघटनेच्या वतीने एक वर्षापासून ग्रामपंचायतला मागणी करीत आहेत. पण याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना आमरण उपोषण करावे लागत असल्याची माहिती उपोषण कर्त्यांनी दिली. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, असी माहिती संघटनेचे अध्यक्ष माधवराव बांते यांनी दिली. यावेळी उपोषणकर्ते शिवशंकर खंगार, मुकूंद गावंडे, अरविंद वासनिक, पीरम देशमुख, मनिष उके, वासुदेव मते, राजकुमार बोंदरे, जितेंद्र हरडे, नत्थु गायधने, जयचंद बोंदरे, कपूर गजभिये, मोतीलाल गजभिये, वसंता बागडे, कृष्णा डाकरे, मुनेश्वर वांद्रे, रंजित लांजेवार, सुखदेव मते, राजकुमार सुर्यवंशी व संध्या वाल्मीक उपस्थित होते. (वार्ताहर)कर्मचाऱ्यांचे अनुदान शासनाने द्यावेग्रामपंचायतचे सर्व स्त्रोत मिळवून येणारे उत्पन्न आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार खर्च हा शासनाने ठरवून दिलेले मर्यादेपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतचे उत्पन्न वर्षाला ३४ लक्ष रूपये आहे. या उत्पन्नातून ग्रामपंचायत स्तरावर येणारे सर्व खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार, विद्युत बिल, विकस कामे आणि त्याच उत्पन्नातून शासनाने ठरवून दिलेले २५ टक्के खर्च बंधनकारक आहे. यात १९ टक्के दलित वस्ती व १० टक्के बाल कल्याण विकासावर खर्च करावा लागतो. सद्यस्थितीत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या मागण्यानुसार पगार दिल्यास एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यावर खर्च होईल. गावात विकास कामे करता येणार नाही. सध्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर होणारे वेतन नियमानुसार आहे. शासनाने आकृतीबंध आराखड्यानुसार जे वेतन कर्मचाऱ्यांना लागू केले आहे, त्याप्रमाणे ग्रामपंचायतला अनुदान दिल्यास सहज मागणी पूर्ण होवू शकते, अशी माहिती सरपंच संजय मिरासे यांनी दिली. यावेळी उपसरपंच मिलिंद रामटेके, ग्राम विकास अधिकारी, भाष्कर डोमने, रविंद्र बोरकर, थारनोद डाकरे व सुनिता बोंदरे उपस्थित होते.ग्रामपंचायत कारभार ठप्प१९ आॅगस्टपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे ग्रामपंचायत काम खोळंबले होते. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामूहिक उपोषणामुळे ग्रामपंचायतचे काम ठप्प पडले. परिणामी जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेत समन्वय होत नसल्यामुळे याचा फटका जनतेला पडत आहे.