शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जिल्हा परिषदेत १४० प्रकरणांचा जलदगतीने निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:48 IST

आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत झिरो पेंडेंसी व डेली डिस्पोझल अभियानांतर्गत १४० प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येथील जिल्हा परिषदेला यश आले आहे. गत वर्षापासून सुरु झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआश्वासित प्रगती योजना : झिरो पेंडेंसी व डेली डिसपोजल अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत झिरो पेंडेंसी व डेली डिस्पोझल अभियानांतर्गत १४० प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येथील जिल्हा परिषदेला यश आले आहे. गत वर्षापासून सुरु झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामात सुत्रता आणली जात आहे. त्यासाठी प्रलंबित प्रकरणाचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात अभियान राबविले जात आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल अकरा विभागातून अधिकारी, कर्मचाºयांच्या सेवाविषयक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आश्वासित प्रगती योजनेच्या माध्यमातून धडक मोहिम राबविण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासन कार्याची गती वाढली तर याठिकाणी काम पूर्ण होण्याच्या आशेने येणारे नागरिकही समाधानी दिसत आहे. त्यांचे काम वेळेवर करण्यात येते. गत वर्षापासून सामान्य प्रशासन विभागाचा पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजूषा ठवकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, वित्त व लेखा अधिकारी योगेश जाधव आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांचा समावेश असलेली समिती सेवाविषयक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कार्यरत आहे. सामान्य प्रशासन, पंचायत, महिला व बालकल्याण, आरोग्य, वित्त, सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे, पशु संवर्धन, शिक्षण विभाग (प्राथमिक), कृषी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये प्रलबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने झाला. १४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचा अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत सामान्य नागरिकांनाही फायदा होणार आहे.अधिकारी -कर्मचाऱ्यांमध्ये आनंदआश्वासित प्रगती योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर झालेली ११७ प्रकरणे व दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेली २३ असा एकुण १४० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणे निकाली काढली. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.