शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

नदीकाठावरील शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्याखाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची शेती वैनगंगा नदीपात्रात सामावली आहे.

ठळक मुद्देबावनथडी व वैनगंगा नदी : जिल्हा प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी आणि वैनंगगा नदीकाठावरील हजारो शेतकºयांची बागायती शेती संकटात आली आहे.जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्याखाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची शेती वैनगंगा नदीपात्रात सामावली आहे. याचा फटका अल्पभूधारक शेतकºयांना बसत असून वैनगंगा नदीकाठावर गावे असणाºया शेतकºयांवर नवीन संकटे येत आहेत. अनेक शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या होत्या. शेतकºयांच्या सातबारावर कर्जाची नोंद असताना नदीकाठावरील शेती आणि त्याला लागून असणाºया विहिरीसुध्दा पाण्याखाली गेल्या आहेत. नदीपात्राच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे तालुक्यासाठी वरदान ठरणाºया नद्या शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरु पाहत आहेत.तुमसर तालुक्यातील अडीच हजार लोकवस्तीच्या बपेरा गावात बहुतांश शेतकरी आहेत. बावनथडी नदीकाठावर शेतकºयांची बागायती शेती आहे. या शेतकºयांसाठी नदीचे वाढते पात्र कर्दनकाळ ठरत आहे. बावनथडी नदीच्या पात्राने मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सिमाभागांची विभागणी केली आहे. आधी नाला स्वरुपात असलेल्या नदी पात्राने आता विशाल रुप धारण केले आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेने दिवसेंदिवस वाढत आहे.बावनथडी नदीच्या वाढत्या पात्रात बपेरा गावातील शेतकºयांची ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. यामध्ये २० हून अधिक विंधन विहिरी भुईसपाट झाल्या आहेत. नदीकाठावरुन विहिरीचे अवशेष आजही साक्ष देत आहेत. गावातील शेतकºयांवर वाढत्या पात्राने मोठे संकट ओढावले आहे.नदीपात्राजवळील शेती पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी शेतमजूर झाले आहेत तर अनेकांना भुमिहीन होण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाल्याने काहीजणांनी गावही सोडले आहे. वडिलोपार्जित शेती नदीपात्रात गेल्याचे दु:ख गावातील शेतकºयांच्या चेहºयावर दिसून येत आहे. मात्र शासनाकडून हे शेतकरी कायमच दुर्लक्षित राहिले आहेत.नदीपात्रात शेती गेल्याच्या समस्येमुळे बपेरा, चुल्हाड, सुकळी, वांगी, परसवाडा, तामसवाडी, पांजरा, नवरगाव, बोरी, उमरवाडा, चारगाव आदी गावातील शेतकरी भूमिहीन झाल्याने शासनाने यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे.रोजगारासाठी शहराकडे पलायननदीकाठावरील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी रोजगारासाठी शहराकडे पलायन करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख वैनगंगा व बावनथडी नदी काठावरील शेतकºयांची शेती पाण्याखाली राहत असल्याने त्यांना उत्पादन मिळत नाही. याविषयी प्रशासनाला माहिती असतानाही नदी काठावरील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी संकटात आहेत.

टॅग्स :agricultureशेती