शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भाजीपाल्याचे दर घसरले शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच ...

भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच परवडण्याजोगे नाही. वांगे १०रुपये किलो, मिरची २० रुपये, टमाटर १२ते १५ , सांबार १० ते १५ , मेथी १०ते १५, पालक दहा ते पंधरा, चवळी भाजी पंधरा ते वीस, पाल्याचे कांदे 20 ते 30, फुल कोबी दहा ते पंधरा, पत्ता गोबी दहा रुपये बारा रुपये, असा पालांदूर येथील आठवडी बाजारातील भाजीपाल्यांचा दर शनिवार ला अनुभवयास मिळाला. या दरात शेतकरी वर्गाला मजुरी ,बियाणे, औषधी, खते यांच खर्च वजा जाता खिशात एक ही रुपया राहण्याची शक्यता दिसत नाही.

तर दुसरीकडे चार महिने कोरोना काळात वाढलेल्या भाजीपाल्याने जनसामान्यांना महागाईचा सामना करावा लागला होता. मात्र भंडारा जिल्ह्यातील स्वतःच्या शेतीतील भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने स्थानीक भाजीपाल्यांचे दर निश्चितच कमी झाल्याने गृहिणींचे बजेट सावरलेले आहे. महिन्याकाठी लागणारा भाजीपाल्याचा बजेट अर्ध्यावर आल्याने महिला वर्गांना हायसे असे वाटत आहे.

पुढे आणखी काही महिन्यापर्यंत भाजीपाल्यांचे दर पडण्याची दाट शक्यता आहे. मागणी व पुरवठा चा आलेख बघता पुरवठा अधिक असून मागणी कायम राहत असल्याने भाजीपाल्याचे दर पुढील दोन महिने अत्यल्पच राहतील असा अंदाज आहे.

कोट

७० डिसमिल शेतीत सांभाराची लागवड केलेली आहे. पेरणीच्या पूर्वी बाजारात सांभाराला अर्थात धनियाला चांगला दर होता. परंतु आमचा भाजीपाला विक्री ला आला आणि भाव पडले. दहा रुपये किलो धनीया काढणीला सुद्धा परवडणे नाही.

टिकाराम भुसारी, भाजी उत्पादक शेतकरी, पालांदूर.