शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भाजीपाल्याचे दर घसरले शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच ...

भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच परवडण्याजोगे नाही. वांगे १०रुपये किलो, मिरची २० रुपये, टमाटर १२ते १५ , सांबार १० ते १५ , मेथी १०ते १५, पालक दहा ते पंधरा, चवळी भाजी पंधरा ते वीस, पाल्याचे कांदे 20 ते 30, फुल कोबी दहा ते पंधरा, पत्ता गोबी दहा रुपये बारा रुपये, असा पालांदूर येथील आठवडी बाजारातील भाजीपाल्यांचा दर शनिवार ला अनुभवयास मिळाला. या दरात शेतकरी वर्गाला मजुरी ,बियाणे, औषधी, खते यांच खर्च वजा जाता खिशात एक ही रुपया राहण्याची शक्यता दिसत नाही.

तर दुसरीकडे चार महिने कोरोना काळात वाढलेल्या भाजीपाल्याने जनसामान्यांना महागाईचा सामना करावा लागला होता. मात्र भंडारा जिल्ह्यातील स्वतःच्या शेतीतील भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने स्थानीक भाजीपाल्यांचे दर निश्चितच कमी झाल्याने गृहिणींचे बजेट सावरलेले आहे. महिन्याकाठी लागणारा भाजीपाल्याचा बजेट अर्ध्यावर आल्याने महिला वर्गांना हायसे असे वाटत आहे.

पुढे आणखी काही महिन्यापर्यंत भाजीपाल्यांचे दर पडण्याची दाट शक्यता आहे. मागणी व पुरवठा चा आलेख बघता पुरवठा अधिक असून मागणी कायम राहत असल्याने भाजीपाल्याचे दर पुढील दोन महिने अत्यल्पच राहतील असा अंदाज आहे.

कोट

७० डिसमिल शेतीत सांभाराची लागवड केलेली आहे. पेरणीच्या पूर्वी बाजारात सांभाराला अर्थात धनियाला चांगला दर होता. परंतु आमचा भाजीपाला विक्री ला आला आणि भाव पडले. दहा रुपये किलो धनीया काढणीला सुद्धा परवडणे नाही.

टिकाराम भुसारी, भाजी उत्पादक शेतकरी, पालांदूर.