शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भाजीपाल्याचे दर घसरले शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच ...

भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच परवडण्याजोगे नाही. वांगे १०रुपये किलो, मिरची २० रुपये, टमाटर १२ते १५ , सांबार १० ते १५ , मेथी १०ते १५, पालक दहा ते पंधरा, चवळी भाजी पंधरा ते वीस, पाल्याचे कांदे 20 ते 30, फुल कोबी दहा ते पंधरा, पत्ता गोबी दहा रुपये बारा रुपये, असा पालांदूर येथील आठवडी बाजारातील भाजीपाल्यांचा दर शनिवार ला अनुभवयास मिळाला. या दरात शेतकरी वर्गाला मजुरी ,बियाणे, औषधी, खते यांच खर्च वजा जाता खिशात एक ही रुपया राहण्याची शक्यता दिसत नाही.

तर दुसरीकडे चार महिने कोरोना काळात वाढलेल्या भाजीपाल्याने जनसामान्यांना महागाईचा सामना करावा लागला होता. मात्र भंडारा जिल्ह्यातील स्वतःच्या शेतीतील भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने स्थानीक भाजीपाल्यांचे दर निश्चितच कमी झाल्याने गृहिणींचे बजेट सावरलेले आहे. महिन्याकाठी लागणारा भाजीपाल्याचा बजेट अर्ध्यावर आल्याने महिला वर्गांना हायसे असे वाटत आहे.

पुढे आणखी काही महिन्यापर्यंत भाजीपाल्यांचे दर पडण्याची दाट शक्यता आहे. मागणी व पुरवठा चा आलेख बघता पुरवठा अधिक असून मागणी कायम राहत असल्याने भाजीपाल्याचे दर पुढील दोन महिने अत्यल्पच राहतील असा अंदाज आहे.

कोट

७० डिसमिल शेतीत सांभाराची लागवड केलेली आहे. पेरणीच्या पूर्वी बाजारात सांभाराला अर्थात धनियाला चांगला दर होता. परंतु आमचा भाजीपाला विक्री ला आला आणि भाव पडले. दहा रुपये किलो धनीया काढणीला सुद्धा परवडणे नाही.

टिकाराम भुसारी, भाजी उत्पादक शेतकरी, पालांदूर.