शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

धान्य विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची ...

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची समस्या ही मी अनेक दिवसांपासून स्वतः जाणून होतो. त्यामुळे प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी वारंवार पाठपुरावा केल्याने आज खऱ्या अर्थाने बळीराजाचे धान्य खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

तालुक्यातील खरबी नाका येथे धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य नीता आकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, खरबीचे उपसरपंच संजय आकरे, ठाण्याच्या सरपंच सुषमा पवार, परसोडीच्या सरपंच कल्पना मोटघरे, ठाण्याच्या माजी सरपंच कल्पना निमकर, साहुलीच्या सरपंच संगीता हटवार, खराडीच्या सरपंच माया हिवसे, शहापूरचे माजी सरपंच दादा सेलोकर, बालाजी वाघमारे, सुभाष वाडीभस्मे, भाऊराव गिरीपुंजे, दूर्वास आकरे, दीपाली आकरे, संस्था सचिव शालिनी गिरिपुंजे, सीमा मोथरकर, चिखलीच्या सरपंच रंजना वाघमारे, अशोक आकरे, चंद्रशेखर गिरडे, गजू बावनकुळे, भगवान लांडगे, नाना बावनकुळे, विजय हटवार, प्रमोद भस्मे यांच्यासह आदर्श सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मोथरकर, अध्यक्ष सुनील गिरिपुंजे, वाल्मीक मोथरकर, विकी गिरिपुंजे, दिनेश भस्मे, रामा आकरे, रणजित गिरिपुंजे, संस्थेचे ग्रेडर सुखमनी साकोरे, श्रीकृष्ण वैद्य, शैलेश मोथरकर, नीलेश मोथरकर, शिवा गिरिपुंजे, योगेश निमकर उपस्थित होते. यावेळी आ. भोंडेकर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून संस्थेचे पदाधिकारी सुनील गिरिपुंजे, उपसरपंच संजय आकरे, गणेश मतकर यांनी परिसरातील शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी संस्थेअंतर्गत धान्य विक्रीसाठी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केल्यानेच खरबी येथे केंद्र मंजूर झाले, त्यामुळे आज बळीराजाचा संघर्ष थोड्याफार प्रमाणात कमी करता आल्याने आज मला समाधान होत आहे.

आता पाण्यासाठी पुढाकार

खरबीचे उपसरपंच संजय आकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी तब्बल ३० ते ४०, प्रसंगी ५० किलोमीटर अंतरावर धान विक्रीसाठी जावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांचा संघर्ष संपला आहे. आता पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांना हक्काचे पाणी आणि कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.