शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

धान्य विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची ...

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची समस्या ही मी अनेक दिवसांपासून स्वतः जाणून होतो. त्यामुळे प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी वारंवार पाठपुरावा केल्याने आज खऱ्या अर्थाने बळीराजाचे धान्य खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

तालुक्यातील खरबी नाका येथे धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य नीता आकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, खरबीचे उपसरपंच संजय आकरे, ठाण्याच्या सरपंच सुषमा पवार, परसोडीच्या सरपंच कल्पना मोटघरे, ठाण्याच्या माजी सरपंच कल्पना निमकर, साहुलीच्या सरपंच संगीता हटवार, खराडीच्या सरपंच माया हिवसे, शहापूरचे माजी सरपंच दादा सेलोकर, बालाजी वाघमारे, सुभाष वाडीभस्मे, भाऊराव गिरीपुंजे, दूर्वास आकरे, दीपाली आकरे, संस्था सचिव शालिनी गिरिपुंजे, सीमा मोथरकर, चिखलीच्या सरपंच रंजना वाघमारे, अशोक आकरे, चंद्रशेखर गिरडे, गजू बावनकुळे, भगवान लांडगे, नाना बावनकुळे, विजय हटवार, प्रमोद भस्मे यांच्यासह आदर्श सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मोथरकर, अध्यक्ष सुनील गिरिपुंजे, वाल्मीक मोथरकर, विकी गिरिपुंजे, दिनेश भस्मे, रामा आकरे, रणजित गिरिपुंजे, संस्थेचे ग्रेडर सुखमनी साकोरे, श्रीकृष्ण वैद्य, शैलेश मोथरकर, नीलेश मोथरकर, शिवा गिरिपुंजे, योगेश निमकर उपस्थित होते. यावेळी आ. भोंडेकर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून संस्थेचे पदाधिकारी सुनील गिरिपुंजे, उपसरपंच संजय आकरे, गणेश मतकर यांनी परिसरातील शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी संस्थेअंतर्गत धान्य विक्रीसाठी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केल्यानेच खरबी येथे केंद्र मंजूर झाले, त्यामुळे आज बळीराजाचा संघर्ष थोड्याफार प्रमाणात कमी करता आल्याने आज मला समाधान होत आहे.

आता पाण्यासाठी पुढाकार

खरबीचे उपसरपंच संजय आकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी तब्बल ३० ते ४०, प्रसंगी ५० किलोमीटर अंतरावर धान विक्रीसाठी जावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांचा संघर्ष संपला आहे. आता पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांना हक्काचे पाणी आणि कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.