शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

By admin | Updated: June 17, 2016 00:45 IST

२०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता...

सुधीर धकाते : खरीप हंगामाकरिता ४५ शेतकरी प्रशिक्षितभंडारा : २०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने यावर्षी चार एकरच्या धानांचा शेतकऱ्यांना पुरवठा करून १५००० क्विंटल बियाणे भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यामधील ६ तालुक्यात शेतकरीच बियाणे शुद्धीकरण व लागवड करून बियाणाची निर्मिती करणार आहेत.पूर्व विदर्भ धान शेतीच्या वैशिष्ट्याचा वारसा व भांडार समजला जात होता. नावाजलेल्या पारंपारिक धानाच्या अनेक जाती यात लुचई, लुडका, दुबराज, हीरानक्की, चिन्नोर, काडीकमो, बासबिर्रा नावारुपाला आणणारा विभाग. काळाच्या ओघात या जाती दुर्मिळ होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परीणामी शेतकरी बियाणामध्ये परावलंबी झाला याचा प्रचिती कृषी जैवविविधतेवर पडली. या बदलाला रोकण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर ‘राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाच्या’ सहकार्याने ‘महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रम’ ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे ‘कृषी जैवविविधत संवर्धनाचे’’ कार्य सुरु झाले. प्रकल्पा अंतर्गत ५ वर्षात भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात कृषी जैवविविधतेचा शोध घेवून शेतकऱ्याद्वारे बियाणाचे शुद्धीकरण करणे, वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण, पोषक घटकाचा अभ्यास, लोकसहभागातून पारंपारिक बियाणे बँकेची निर्मिती, बियाणाचा विस्तार दुर्मिळ वाणाचे जैवविविधता नोंदवून राष्ट्रीय जनुक कोष मध्ये नोंदणी करणे हे उद्दिष्टये आहे. यावर्षीच्या हंगामासाठी साकोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यातील ४५ गावातील शेतकरी गटप्रमुखाची निवड करण्यात आली. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या प्रशिक्षण सभागृहात बीज संवर्धन शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाचे समन्यवक सुधीर धकाते व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणामध्ये बियाणे शुद्धीकरणाचे टप्पे, बियाणे लागवड पद्धती शेतकऱ्यांनी समजून घेतली. प्रत्येक गावात ६ शेतकऱ्यांची निवड होईल. ७५ एकरामध्ये २५० शेतकऱ्यांची निवड करून शास्त्रीय पद्धतीने बियाणाची लागवड करून घेण्याची जबाबदारी गटप्रमुखानी स्वीकारली. पुढील हंगामाकरिता बियाणे निर्मिती करून २५ बिज बॅक प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रम देखरेख प्रक्रिया व व्यवस्थापन प्रक्रिया संक्षम करण्याची जबाबदारी देवेंद्र राऊत (मोरगाव अर्जुनी), ज्ञानेश्वर बनकर (साकोली), भदुजी कायते (भंडारा), छत्रपती बघमारे (ब्रम्हपुरी) यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रशिक्षण यशस्वी होण्यास यांचे योगदान मिळाले. सदर उपक्रमामुळे स्थानिक जातीे पिकांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल. तसेच पोषमुल्य असलेले अन्न ग्राहकांना उपलब्ध होतील व दुर्मीळ बियाणावर शेतकऱ्यांचे हक्क प्रस्तापित होण्यासाठी मदत होईल. (नगर प्रतिनिधी)