शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

By admin | Updated: June 17, 2016 00:45 IST

२०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता...

सुधीर धकाते : खरीप हंगामाकरिता ४५ शेतकरी प्रशिक्षितभंडारा : २०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने यावर्षी चार एकरच्या धानांचा शेतकऱ्यांना पुरवठा करून १५००० क्विंटल बियाणे भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यामधील ६ तालुक्यात शेतकरीच बियाणे शुद्धीकरण व लागवड करून बियाणाची निर्मिती करणार आहेत.पूर्व विदर्भ धान शेतीच्या वैशिष्ट्याचा वारसा व भांडार समजला जात होता. नावाजलेल्या पारंपारिक धानाच्या अनेक जाती यात लुचई, लुडका, दुबराज, हीरानक्की, चिन्नोर, काडीकमो, बासबिर्रा नावारुपाला आणणारा विभाग. काळाच्या ओघात या जाती दुर्मिळ होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परीणामी शेतकरी बियाणामध्ये परावलंबी झाला याचा प्रचिती कृषी जैवविविधतेवर पडली. या बदलाला रोकण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर ‘राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाच्या’ सहकार्याने ‘महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रम’ ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे ‘कृषी जैवविविधत संवर्धनाचे’’ कार्य सुरु झाले. प्रकल्पा अंतर्गत ५ वर्षात भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात कृषी जैवविविधतेचा शोध घेवून शेतकऱ्याद्वारे बियाणाचे शुद्धीकरण करणे, वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण, पोषक घटकाचा अभ्यास, लोकसहभागातून पारंपारिक बियाणे बँकेची निर्मिती, बियाणाचा विस्तार दुर्मिळ वाणाचे जैवविविधता नोंदवून राष्ट्रीय जनुक कोष मध्ये नोंदणी करणे हे उद्दिष्टये आहे. यावर्षीच्या हंगामासाठी साकोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यातील ४५ गावातील शेतकरी गटप्रमुखाची निवड करण्यात आली. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या प्रशिक्षण सभागृहात बीज संवर्धन शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाचे समन्यवक सुधीर धकाते व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणामध्ये बियाणे शुद्धीकरणाचे टप्पे, बियाणे लागवड पद्धती शेतकऱ्यांनी समजून घेतली. प्रत्येक गावात ६ शेतकऱ्यांची निवड होईल. ७५ एकरामध्ये २५० शेतकऱ्यांची निवड करून शास्त्रीय पद्धतीने बियाणाची लागवड करून घेण्याची जबाबदारी गटप्रमुखानी स्वीकारली. पुढील हंगामाकरिता बियाणे निर्मिती करून २५ बिज बॅक प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रम देखरेख प्रक्रिया व व्यवस्थापन प्रक्रिया संक्षम करण्याची जबाबदारी देवेंद्र राऊत (मोरगाव अर्जुनी), ज्ञानेश्वर बनकर (साकोली), भदुजी कायते (भंडारा), छत्रपती बघमारे (ब्रम्हपुरी) यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रशिक्षण यशस्वी होण्यास यांचे योगदान मिळाले. सदर उपक्रमामुळे स्थानिक जातीे पिकांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल. तसेच पोषमुल्य असलेले अन्न ग्राहकांना उपलब्ध होतील व दुर्मीळ बियाणावर शेतकऱ्यांचे हक्क प्रस्तापित होण्यासाठी मदत होईल. (नगर प्रतिनिधी)