शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

By admin | Updated: June 17, 2016 00:45 IST

२०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता...

सुधीर धकाते : खरीप हंगामाकरिता ४५ शेतकरी प्रशिक्षितभंडारा : २०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने यावर्षी चार एकरच्या धानांचा शेतकऱ्यांना पुरवठा करून १५००० क्विंटल बियाणे भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यामधील ६ तालुक्यात शेतकरीच बियाणे शुद्धीकरण व लागवड करून बियाणाची निर्मिती करणार आहेत.पूर्व विदर्भ धान शेतीच्या वैशिष्ट्याचा वारसा व भांडार समजला जात होता. नावाजलेल्या पारंपारिक धानाच्या अनेक जाती यात लुचई, लुडका, दुबराज, हीरानक्की, चिन्नोर, काडीकमो, बासबिर्रा नावारुपाला आणणारा विभाग. काळाच्या ओघात या जाती दुर्मिळ होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परीणामी शेतकरी बियाणामध्ये परावलंबी झाला याचा प्रचिती कृषी जैवविविधतेवर पडली. या बदलाला रोकण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर ‘राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाच्या’ सहकार्याने ‘महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रम’ ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे ‘कृषी जैवविविधत संवर्धनाचे’’ कार्य सुरु झाले. प्रकल्पा अंतर्गत ५ वर्षात भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात कृषी जैवविविधतेचा शोध घेवून शेतकऱ्याद्वारे बियाणाचे शुद्धीकरण करणे, वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण, पोषक घटकाचा अभ्यास, लोकसहभागातून पारंपारिक बियाणे बँकेची निर्मिती, बियाणाचा विस्तार दुर्मिळ वाणाचे जैवविविधता नोंदवून राष्ट्रीय जनुक कोष मध्ये नोंदणी करणे हे उद्दिष्टये आहे. यावर्षीच्या हंगामासाठी साकोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यातील ४५ गावातील शेतकरी गटप्रमुखाची निवड करण्यात आली. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या प्रशिक्षण सभागृहात बीज संवर्धन शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाचे समन्यवक सुधीर धकाते व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणामध्ये बियाणे शुद्धीकरणाचे टप्पे, बियाणे लागवड पद्धती शेतकऱ्यांनी समजून घेतली. प्रत्येक गावात ६ शेतकऱ्यांची निवड होईल. ७५ एकरामध्ये २५० शेतकऱ्यांची निवड करून शास्त्रीय पद्धतीने बियाणाची लागवड करून घेण्याची जबाबदारी गटप्रमुखानी स्वीकारली. पुढील हंगामाकरिता बियाणे निर्मिती करून २५ बिज बॅक प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रम देखरेख प्रक्रिया व व्यवस्थापन प्रक्रिया संक्षम करण्याची जबाबदारी देवेंद्र राऊत (मोरगाव अर्जुनी), ज्ञानेश्वर बनकर (साकोली), भदुजी कायते (भंडारा), छत्रपती बघमारे (ब्रम्हपुरी) यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रशिक्षण यशस्वी होण्यास यांचे योगदान मिळाले. सदर उपक्रमामुळे स्थानिक जातीे पिकांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल. तसेच पोषमुल्य असलेले अन्न ग्राहकांना उपलब्ध होतील व दुर्मीळ बियाणावर शेतकऱ्यांचे हक्क प्रस्तापित होण्यासाठी मदत होईल. (नगर प्रतिनिधी)