शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

शेतकऱ्यांना या वर्षीही मिळणार बांधावरच खते बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारी मध्ये शेतकरी ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारी मध्ये शेतकरी व्यस्त असून, शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीसाठी कुठेही गर्दी न करता, गावातील शेतकरी गटामार्फतच खते व बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सहकार्याने कृषी निविष्ठा पोहोचण्यासाठी कृषी विभागातर्फे कृषिसेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये समन्वय ठेवून कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामपातळीवर समन्वयातून गतवर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पुरवली जाणार आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर बियाणे, खते शेतकरी गटामार्फत नोंदणी करून अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करावे, कृषी केंद्रावर गटाचा एकच प्रतिनिधी पाठवून एकूण मालाची मागणी नोंदवावी, दुकानात गर्दी करू नये, बियाणे खते खरेदीसाठी गावातील कोणत्याही एका गटात शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, गटामध्ये अद्याप नोंदणी केलेले नसल्यास, या वर्षी निविष्ठा खरेदीसाठी कमीतकमी पाच शेतकऱ्यांचा मिळून आत्मा अंतर्गत गट तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते कीटकनाशके खरेदी केल्यानंतर अधिकृत पावती जपून ठेवावी, खते खरेदी करताना पक्क्या बिलांसह, पॉस मशीनच्याच बिलाचा दुकानदारास आग्रह करावा. पिशवीवरील प्रिंटेड किमतीपेक्षा जास्त किंमत देऊ नये, खरे खरेदी किंमत असलेल्या बियाणे, खते पिशवीवरील मजकूर, लॉटनंबर बिलावर बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बियाणे पेरणी करताना, बियाण्याच्या पिशवीचा खालचा भाग फोडून बियाणे काढावे, जेणेकरून पिशवीला लावलेले लेबल जसेच्या तसे कायम राहतील, बियाणे वापरताना कमीतकमी अर्धा किलो एक किलो बियाणे पिशवीसह हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. लागवडीनंतर बियाणे उगवण क्षमता, बियाणे भेसळ आदी कोणतीही तक्रार आल्यास, त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविता येईल. बियाणे, खते कीटकनाशके बाबतची कोणतीही तक्रार शेतकऱ्यांना आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी. मात्र, खरीप हंगामातील खते, बियाणे खरेदीसाठी शासनाने दिलेल्या ‘ब्रेक द चैन’ निर्देशांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

कोट

शेतकऱ्यांची खरीप हंगामात कुठेही गैरसोय होणार नाही, यासाठी गटामार्फत एकत्रित बियाणे खरेदी करावे. शेतकऱ्यांनी एकत्रित मागणी करून परवानाधारक कृषिसेवा केंद्रामार्फतच बांधावर खते बियाणे पोहोच होण्यासाठी आपली मागणी गटामार्फत कृषी केंद्रांकडे नोंदवावी.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक भंडारा.

बॉक्स

शेतकऱ्यांनो, या गोष्टी अवश्य करा

शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना कुठेही गर्दी करू नये. गटामार्फत खरेदी करावे. यासोबतच दुकानदारांकडे पक्क्या बिलांचा आग्रह धरावा. काही बियाणे पेरणीपूर्वी राखून पिशवीसह जपून ठेवावे. प्रत्येक गावांमध्ये पाच जणांनी एकत्र येऊन गट तयार करावा. जे पूर्वीचे जुने शेतकरी गट आहेत. त्यांना गटामार्फत खते, बियाणे, बियाणे खरेदीची प्रक्रिया माहीत आहे. शेतकऱ्यांनी शासन निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भंडाराचे प्रदीप म्हसकर यांनी केले आहे.