शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्यांना या वर्षीही मिळणार बांधावरच खते बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारी मध्ये शेतकरी ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारी मध्ये शेतकरी व्यस्त असून, शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीसाठी कुठेही गर्दी न करता, गावातील शेतकरी गटामार्फतच खते व बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सहकार्याने कृषी निविष्ठा पोहोचण्यासाठी कृषी विभागातर्फे कृषिसेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये समन्वय ठेवून कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामपातळीवर समन्वयातून गतवर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पुरवली जाणार आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर बियाणे, खते शेतकरी गटामार्फत नोंदणी करून अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करावे, कृषी केंद्रावर गटाचा एकच प्रतिनिधी पाठवून एकूण मालाची मागणी नोंदवावी, दुकानात गर्दी करू नये, बियाणे खते खरेदीसाठी गावातील कोणत्याही एका गटात शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, गटामध्ये अद्याप नोंदणी केलेले नसल्यास, या वर्षी निविष्ठा खरेदीसाठी कमीतकमी पाच शेतकऱ्यांचा मिळून आत्मा अंतर्गत गट तयार करण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते कीटकनाशके खरेदी केल्यानंतर अधिकृत पावती जपून ठेवावी, खते खरेदी करताना पक्क्या बिलांसह, पॉस मशीनच्याच बिलाचा दुकानदारास आग्रह करावा. पिशवीवरील प्रिंटेड किमतीपेक्षा जास्त किंमत देऊ नये, खरे खरेदी किंमत असलेल्या बियाणे, खते पिशवीवरील मजकूर, लॉटनंबर बिलावर बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बियाणे पेरणी करताना, बियाण्याच्या पिशवीचा खालचा भाग फोडून बियाणे काढावे, जेणेकरून पिशवीला लावलेले लेबल जसेच्या तसे कायम राहतील, बियाणे वापरताना कमीतकमी अर्धा किलो एक किलो बियाणे पिशवीसह हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. लागवडीनंतर बियाणे उगवण क्षमता, बियाणे भेसळ आदी कोणतीही तक्रार आल्यास, त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविता येईल. बियाणे, खते कीटकनाशके बाबतची कोणतीही तक्रार शेतकऱ्यांना आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी. मात्र, खरीप हंगामातील खते, बियाणे खरेदीसाठी शासनाने दिलेल्या ‘ब्रेक द चैन’ निर्देशांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

कोट

शेतकऱ्यांची खरीप हंगामात कुठेही गैरसोय होणार नाही, यासाठी गटामार्फत एकत्रित बियाणे खरेदी करावे. शेतकऱ्यांनी एकत्रित मागणी करून परवानाधारक कृषिसेवा केंद्रामार्फतच बांधावर खते बियाणे पोहोच होण्यासाठी आपली मागणी गटामार्फत कृषी केंद्रांकडे नोंदवावी.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक भंडारा.

बॉक्स

शेतकऱ्यांनो, या गोष्टी अवश्य करा

शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना कुठेही गर्दी करू नये. गटामार्फत खरेदी करावे. यासोबतच दुकानदारांकडे पक्क्या बिलांचा आग्रह धरावा. काही बियाणे पेरणीपूर्वी राखून पिशवीसह जपून ठेवावे. प्रत्येक गावांमध्ये पाच जणांनी एकत्र येऊन गट तयार करावा. जे पूर्वीचे जुने शेतकरी गट आहेत. त्यांना गटामार्फत खते, बियाणे, बियाणे खरेदीची प्रक्रिया माहीत आहे. शेतकऱ्यांनी शासन निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, भंडाराचे प्रदीप म्हसकर यांनी केले आहे.