शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

कोंढा येथे उपबाजारात शेतकऱ्यांचे उन्हाळी धान उघड्यावर

By admin | Updated: June 6, 2017 00:23 IST

चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे.

मालाची प्रचंड हानी : गोडाऊन उभारण्याची मागणी, राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभावलोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे. ते विकण्यासाठी शेतकरी कोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपयार्डमध्ये नेत आहे. पण तेथे शेतकऱ्यांसाठी गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ठेवावे लागत आहे.कोंढा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नाही. पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून कोंढा परिसर आहे. या परिसरात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पण खरीप हंगामात घेतलेल्या धानासाठी व उन्हाळी धानासाठी आधारभूत केंद्र नाही. ही एक कोंढा परिसरासाठी शोकांतिका आहे. कोंढा येथे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. पण शासकीय आधारभूत केंद्र दोन वर्षापासून नाही. त्यामुळे सर्वांना चकारा (अड्याळ) येथे धान विकण्यासाठी न्यावे लागते. कोंढा येथे अनेक राईस मिल आहेत. तिथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होऊ शकते. पण एकाही पुढाऱ्याची इच्छाशक्ती नाही. म्हणून शेतकऱ्यांना नाईलाजाने उपबाजार, कोंढा येथे तसेच व्यापाऱ्यांना धान विकावे लागते. शेतकरी अकाली पाऊस तसेच अनेक अस्मानी तर दुसरीकडे सुलताने माऱ्यामुळे मेटाकुटीला आला आहे. उन्हाळी धान पाण्याची सुविधा असणाऱ्यांनी अत्यल्प प्रमाणात पीक घेतले. कारण चौरास भागात पाण्याची पातळी खोल गेली असून सतत विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पाण्याअभावी गेले आहे. अशा अवस्थेत अत्यल्प प्रमाणात उन्हाळी धान पीक निघाले तर त्याला सुरक्षीत ठेवण्याची सुविधा नाही. आधारभूत केंद्र कोंढा येथे नसल्याने शेतकऱ्यांनी आपले धान उपबाजार कोंढा येथे विकण्यासाठी आणले आहेत. सध्या उपबाजार कोंढा येथे उघड्यावर धान ठेवले आहे. पाऊस पडण्याचे दिवस असल्याने केव्हाही पाऊस पडल्यास उन्हाळी धान पिकांची नासाडी होऊ शकते. तेव्हा उपबाजार कोंढा येथे धान्य ठेवण्यासाठी गोडाऊनची गरज आहे.कोंढा उपबाजारात मालाची आवककृषी उत्पन्न बाजार समिती, पवनी अंतर्गत कोंढा येथे उपबाजार सुरु करण्यात आले. येथे वर्षभर सर्व खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात आवक असते. पवनी तालुक्यातील सर्वात जास्त माल कोंढा येथे उपबाजारात येते. पण माल गोडाऊन नसल्याने उघड्यावर पडून असते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर असल्याने चोरी होते. तसेच अचानक पाऊस पडल्यास मालाची प्रचंड हानी होते. तरी उपबाजार येथे शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण मिळावे यासाठी गोडाऊची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळी धान उघड्यावर पडले असून पावसाळा सुरु होणार आहे. तेव्हा धानाची नासाडी होण्याची मोठी शक्यता तेव्हा कोंढा येथील उपबाजार येथे गोडाऊन उभारण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.