शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कोंढा येथे उपबाजारात शेतकऱ्यांचे उन्हाळी धान उघड्यावर

By admin | Updated: June 6, 2017 00:23 IST

चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे.

मालाची प्रचंड हानी : गोडाऊन उभारण्याची मागणी, राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभावलोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे. ते विकण्यासाठी शेतकरी कोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपयार्डमध्ये नेत आहे. पण तेथे शेतकऱ्यांसाठी गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ठेवावे लागत आहे.कोंढा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नाही. पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून कोंढा परिसर आहे. या परिसरात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पण खरीप हंगामात घेतलेल्या धानासाठी व उन्हाळी धानासाठी आधारभूत केंद्र नाही. ही एक कोंढा परिसरासाठी शोकांतिका आहे. कोंढा येथे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. पण शासकीय आधारभूत केंद्र दोन वर्षापासून नाही. त्यामुळे सर्वांना चकारा (अड्याळ) येथे धान विकण्यासाठी न्यावे लागते. कोंढा येथे अनेक राईस मिल आहेत. तिथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होऊ शकते. पण एकाही पुढाऱ्याची इच्छाशक्ती नाही. म्हणून शेतकऱ्यांना नाईलाजाने उपबाजार, कोंढा येथे तसेच व्यापाऱ्यांना धान विकावे लागते. शेतकरी अकाली पाऊस तसेच अनेक अस्मानी तर दुसरीकडे सुलताने माऱ्यामुळे मेटाकुटीला आला आहे. उन्हाळी धान पाण्याची सुविधा असणाऱ्यांनी अत्यल्प प्रमाणात पीक घेतले. कारण चौरास भागात पाण्याची पातळी खोल गेली असून सतत विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पाण्याअभावी गेले आहे. अशा अवस्थेत अत्यल्प प्रमाणात उन्हाळी धान पीक निघाले तर त्याला सुरक्षीत ठेवण्याची सुविधा नाही. आधारभूत केंद्र कोंढा येथे नसल्याने शेतकऱ्यांनी आपले धान उपबाजार कोंढा येथे विकण्यासाठी आणले आहेत. सध्या उपबाजार कोंढा येथे उघड्यावर धान ठेवले आहे. पाऊस पडण्याचे दिवस असल्याने केव्हाही पाऊस पडल्यास उन्हाळी धान पिकांची नासाडी होऊ शकते. तेव्हा उपबाजार कोंढा येथे धान्य ठेवण्यासाठी गोडाऊनची गरज आहे.कोंढा उपबाजारात मालाची आवककृषी उत्पन्न बाजार समिती, पवनी अंतर्गत कोंढा येथे उपबाजार सुरु करण्यात आले. येथे वर्षभर सर्व खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात आवक असते. पवनी तालुक्यातील सर्वात जास्त माल कोंढा येथे उपबाजारात येते. पण माल गोडाऊन नसल्याने उघड्यावर पडून असते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर असल्याने चोरी होते. तसेच अचानक पाऊस पडल्यास मालाची प्रचंड हानी होते. तरी उपबाजार येथे शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण मिळावे यासाठी गोडाऊची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळी धान उघड्यावर पडले असून पावसाळा सुरु होणार आहे. तेव्हा धानाची नासाडी होण्याची मोठी शक्यता तेव्हा कोंढा येथील उपबाजार येथे गोडाऊन उभारण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.