शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

शेतकरी पुत्र बनला भारतीय कृषी खात्याचा संशोधक

By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST

जिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण कमी दर्जाचे असल्याची धारणा हल्लीच्या पालकांमध्ये दृढावली आहे.

देशातून केवळ ११ जणांची निवड, अभिषेक वाघाये यांची गगनभरारीप्रशांत देसाई  भंडाराजिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण कमी दर्जाचे असल्याची धारणा हल्लीच्या पालकांमध्ये दृढावली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. हा शिक्षण विभागासमोर चिंतनाचा विषय असला तरी, जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्याने भरारी मारली आहे.लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील अभिषेक मिताराम वाघाये या विद्यार्थ्याची दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या संशोधकपदी निवड झाली आहे. भंडारा धान उत्पादक व शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत जिल्ह्यातील शेतकरी पुत्र असलेल्या अभिषेक या विद्यार्थ्याने गाठलेले हे यश जिल्हावासीयांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा (वाघ) येथील मिताराम हे सर्वसाधारण शेतकरी. त्यांना पाच मुली व एक मुलगा असे अपत्य आहे. गावात शैक्षणिक वातावरण नसतानाही अभिषेक गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतरचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लाखनी येथील समर्थ विद्यालयात घेवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद गांधी महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षणाची गोडी जीवनात कृषी क्षेत्रात काम करण्याची प्रगल्भ इच्छा असल्याने अभिषेकने बी. टेक पर्यंतचे शिक्षण कॉलेज आॅफ अ‍ॅग्री इंजी. अकोला व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे घेतले. त्यानंतरचे एम. टेकचे शिक्षण भूमी व जल व्यवस्थापन अभियांत्रिकी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी खडकपूर येथे पूर्ण केले. कृषी क्षेत्रात योगदान देण्याचा मनात त्यांनी संकल्प केला असल्याने कृषी वैज्ञानिक चयन मंडळाच्यावतीने घेतलेली अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च सर्व्हीसेसची परीक्षा दिली. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थीही मागे नाही हे दाखवून देत परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. संशोधक या पदासाठी घेण्यात आलेली एआरएस ही परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन्ही भागातील परीक्षेत तो परीक्षकांच्या कसोटीत खरा उतरला. भूमी व जल व्यवस्थापन अभियांत्रिकी या विषयात भारतातून केवळ ११ संशोधकांची निवड करण्यात आली त्यात अभिषेकचा समावेश आहे. केसलवाडा सारख्या ग्रामीण भागातील अभिषेकची भारतीय कृषी अुनसंधान परिषदच्या संशोधकपदी निवड झाली असून तो जिल्हावासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.हैदराबाद येथे होणार प्रशिक्षणमुख्य परीक्षेत यश मिळाल्याने त्याची मेरीट यादीनुसार निवड झाली. त्याची हैदराबाद येथील नॅशनल अ‍ॅकेडमी आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तो १ जानेवारीपासून कृषी खात्याच्या प्रशिक्षणासाठी रूजू होत आहे. पालकांसाठी शिक्षणाचा संदेशसरकारी शाळा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती प्रमाण वाढले आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद होत आहेत. जि.प. शाळांमधूनही मिळालेले शिक्षण जीवनात यशस्वी बनविते, असाच संदेश अभिषेकच्या यशाने पालकांना दिला आहे.