शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्र बनला भारतीय कृषी खात्याचा संशोधक

By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST

जिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण कमी दर्जाचे असल्याची धारणा हल्लीच्या पालकांमध्ये दृढावली आहे.

देशातून केवळ ११ जणांची निवड, अभिषेक वाघाये यांची गगनभरारीप्रशांत देसाई  भंडाराजिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण कमी दर्जाचे असल्याची धारणा हल्लीच्या पालकांमध्ये दृढावली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. हा शिक्षण विभागासमोर चिंतनाचा विषय असला तरी, जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्याने भरारी मारली आहे.लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील अभिषेक मिताराम वाघाये या विद्यार्थ्याची दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या संशोधकपदी निवड झाली आहे. भंडारा धान उत्पादक व शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत जिल्ह्यातील शेतकरी पुत्र असलेल्या अभिषेक या विद्यार्थ्याने गाठलेले हे यश जिल्हावासीयांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा (वाघ) येथील मिताराम हे सर्वसाधारण शेतकरी. त्यांना पाच मुली व एक मुलगा असे अपत्य आहे. गावात शैक्षणिक वातावरण नसतानाही अभिषेक गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतरचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लाखनी येथील समर्थ विद्यालयात घेवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण जिल्हा परिषद गांधी महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षणाची गोडी जीवनात कृषी क्षेत्रात काम करण्याची प्रगल्भ इच्छा असल्याने अभिषेकने बी. टेक पर्यंतचे शिक्षण कॉलेज आॅफ अ‍ॅग्री इंजी. अकोला व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे घेतले. त्यानंतरचे एम. टेकचे शिक्षण भूमी व जल व्यवस्थापन अभियांत्रिकी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी खडकपूर येथे पूर्ण केले. कृषी क्षेत्रात योगदान देण्याचा मनात त्यांनी संकल्प केला असल्याने कृषी वैज्ञानिक चयन मंडळाच्यावतीने घेतलेली अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च सर्व्हीसेसची परीक्षा दिली. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थीही मागे नाही हे दाखवून देत परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. संशोधक या पदासाठी घेण्यात आलेली एआरएस ही परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन्ही भागातील परीक्षेत तो परीक्षकांच्या कसोटीत खरा उतरला. भूमी व जल व्यवस्थापन अभियांत्रिकी या विषयात भारतातून केवळ ११ संशोधकांची निवड करण्यात आली त्यात अभिषेकचा समावेश आहे. केसलवाडा सारख्या ग्रामीण भागातील अभिषेकची भारतीय कृषी अुनसंधान परिषदच्या संशोधकपदी निवड झाली असून तो जिल्हावासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.हैदराबाद येथे होणार प्रशिक्षणमुख्य परीक्षेत यश मिळाल्याने त्याची मेरीट यादीनुसार निवड झाली. त्याची हैदराबाद येथील नॅशनल अ‍ॅकेडमी आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तो १ जानेवारीपासून कृषी खात्याच्या प्रशिक्षणासाठी रूजू होत आहे. पालकांसाठी शिक्षणाचा संदेशसरकारी शाळा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती प्रमाण वाढले आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद होत आहेत. जि.प. शाळांमधूनही मिळालेले शिक्षण जीवनात यशस्वी बनविते, असाच संदेश अभिषेकच्या यशाने पालकांना दिला आहे.