शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

शेतकरी धडकले पाटबंधारे कार्यालयावर

By admin | Updated: September 29, 2014 22:59 IST

रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोश करडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर

चौकशीची मागणी : रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोशकरडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर पासून शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र वाटपावर गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नाही. दि.२९ सप्टेंबरपर्यंत करडी परिसरात पाणी पोहचले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेवून गैरप्रकार केल्याचा आरोप करीत शेकडो शेतकरी तिरोडा तालुक्यातील सितेपार येथील कार्यालयावर धडकले. परंतु कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पळाले. प्रकरणी चौकशी आणि शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सितेपार गावी रिसाळा जलाशयाचे पाणी वाटप करण्याचे, नियंत्रण व देखभाल दुरूस्तीचे अधिकार असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालयावर आहे. परंतू सदर ठिकाणी अधिकारी बसत नसल्याने कर्मचाऱ्यांवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे अनेकदा दिसून येते. कर्मचाऱ्यांचे बेबंदशाही धोरण येथून राबविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून अनेकदा होतो. परंतू अधिकारी दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांचे धाडस वाढलेले आहे. पाणी वाटपात गैरप्रकार करणे नेहमीचे होऊन बसले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहचविता सुरूवातीलाच पाण्याचे वाटप केले जाते. ओलिताचा कर वसूल केला जात असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. कोरड्या दुष्काळाने उत्पन्नात घट होते ती वेगळीच.दि.२४ सप्टेंबर २०१४ पासून रिसाळा जलाशयाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र ५ दिवसाचा कालावधी लोटत असताना शेवटच्या टोकावरील करडी व मुंढरी शेतशिवारात पाणी पोहचले नाही. करडी येथील कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने ठाणा कालवा व कनार कालवा कोरडा आहे. परिसरातील शेतीला भेगा पडल्या असून पिके करपली आहेत. त्वरित पाण्याची गरज असताना जलाशयाजवळील शेतकऱ्यांनाच पाण्याचा लाभ दिला जात आहे. पाणी सोडलेले असताना पाणी वाटपाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी अजुनपर्यंत विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालव्यावर पोहचलेले नाही. बेबंदशाहीचा प्रकार सर्रास सुरू आहे. संतप्त करडी येथील शेकडो शेतकरी दि.२८ सप्टेंबर रोजी सितेपार कार्यालयावर धडकले असता कार्यालयात कोणतेही कर्मचारी वा अधिकारी दिसून आले नाहीत. कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचारी पळाले असल्याची शंका आहे. आक्रोशित शेतकऱ्यांनी रिसाळा जलाशयातून निघणाऱ्या कालव्याचे निरीक्षण केले असता मुख्य कालव्याच्या उपशाखांचे सर्व गेट तोडलेले दिसून आले. त्याकडे कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा परिणाम म्हणून करडी पर्यंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे नापिकी होवून शेतकऱ्यांवर उपासमारिची वेळ आहे. शेतीला त्वरित पाणी न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नसल्यांचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांकडून मुख्य कालवा कापून काही शेतकऱ्यांना पाणी वाटप केला जात असल्याचा आरोप आहे. प्रकरणी चौकशी करावी अन्यथा न्यायासाठी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा शेतकरी निलेश इलमे, निलेश काढवे, नत्थू गाढवे, भागवत डोहळे, होलू शहारे, राजेश तिजारे, वासुदेव साठवणे, राजेश भारतकर, प्रकाश हलमारे, राजेश डोहळे, शामराव मोहतुरे, शिवराम कावळे, बाळू सार्वे, जगदिश मुलतानी, अमोल पालांदूरकर, टिनू राऊत, नामदेव खोब्रागडे, भाऊराव मोटकरे, शामू पंचबुद्धे व अन्य शेतकऱ्यांनी प्रसिद्धी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)