शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धडकले पाटबंधारे कार्यालयावर

By admin | Updated: September 29, 2014 22:59 IST

रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोश करडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर

चौकशीची मागणी : रिसाळा जलाशयावरील कर्मचाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप, पाण्यासाठी आक्रोशकरडी (पालोरा) : रिसाळा जलाशयातील पाणी दि.२४ सप्टेंबर पासून शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र वाटपावर गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नाही. दि.२९ सप्टेंबरपर्यंत करडी परिसरात पाणी पोहचले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे घेवून गैरप्रकार केल्याचा आरोप करीत शेकडो शेतकरी तिरोडा तालुक्यातील सितेपार येथील कार्यालयावर धडकले. परंतु कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पळाले. प्रकरणी चौकशी आणि शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सितेपार गावी रिसाळा जलाशयाचे पाणी वाटप करण्याचे, नियंत्रण व देखभाल दुरूस्तीचे अधिकार असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालयावर आहे. परंतू सदर ठिकाणी अधिकारी बसत नसल्याने कर्मचाऱ्यांवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे अनेकदा दिसून येते. कर्मचाऱ्यांचे बेबंदशाही धोरण येथून राबविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून अनेकदा होतो. परंतू अधिकारी दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांचे धाडस वाढलेले आहे. पाणी वाटपात गैरप्रकार करणे नेहमीचे होऊन बसले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहचविता सुरूवातीलाच पाण्याचे वाटप केले जाते. ओलिताचा कर वसूल केला जात असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. कोरड्या दुष्काळाने उत्पन्नात घट होते ती वेगळीच.दि.२४ सप्टेंबर २०१४ पासून रिसाळा जलाशयाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. मात्र ५ दिवसाचा कालावधी लोटत असताना शेवटच्या टोकावरील करडी व मुंढरी शेतशिवारात पाणी पोहचले नाही. करडी येथील कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने ठाणा कालवा व कनार कालवा कोरडा आहे. परिसरातील शेतीला भेगा पडल्या असून पिके करपली आहेत. त्वरित पाण्याची गरज असताना जलाशयाजवळील शेतकऱ्यांनाच पाण्याचा लाभ दिला जात आहे. पाणी सोडलेले असताना पाणी वाटपाचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी अजुनपर्यंत विभागाचे अधिकारी व कर्मचारी कालव्यावर पोहचलेले नाही. बेबंदशाहीचा प्रकार सर्रास सुरू आहे. संतप्त करडी येथील शेकडो शेतकरी दि.२८ सप्टेंबर रोजी सितेपार कार्यालयावर धडकले असता कार्यालयात कोणतेही कर्मचारी वा अधिकारी दिसून आले नाहीत. कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचारी पळाले असल्याची शंका आहे. आक्रोशित शेतकऱ्यांनी रिसाळा जलाशयातून निघणाऱ्या कालव्याचे निरीक्षण केले असता मुख्य कालव्याच्या उपशाखांचे सर्व गेट तोडलेले दिसून आले. त्याकडे कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा परिणाम म्हणून करडी पर्यंत पाणी पोहचले नाही. त्यामुळे नापिकी होवून शेतकऱ्यांवर उपासमारिची वेळ आहे. शेतीला त्वरित पाणी न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नसल्यांचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांकडून मुख्य कालवा कापून काही शेतकऱ्यांना पाणी वाटप केला जात असल्याचा आरोप आहे. प्रकरणी चौकशी करावी अन्यथा न्यायासाठी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा शेतकरी निलेश इलमे, निलेश काढवे, नत्थू गाढवे, भागवत डोहळे, होलू शहारे, राजेश तिजारे, वासुदेव साठवणे, राजेश भारतकर, प्रकाश हलमारे, राजेश डोहळे, शामराव मोहतुरे, शिवराम कावळे, बाळू सार्वे, जगदिश मुलतानी, अमोल पालांदूरकर, टिनू राऊत, नामदेव खोब्रागडे, भाऊराव मोटकरे, शामू पंचबुद्धे व अन्य शेतकऱ्यांनी प्रसिद्धी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)