शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: December 12, 2015 00:43 IST

जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो.

नाना पटोले यांचे आवाहन : १९५ लाभार्थ्यांची निवड भंडारा : जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो. त्यामुळे शेतकरी यांचे फार मोठे नुकसान होते. ही बाब अनेक वर्षापासून प्रलंबित होती, परंतु सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सरकारने याला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.भंडारा जिल्ह्यासाठी शासनाने यावर्षी १९५ लाभार्थ्यांची निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यावेळी फक्त १९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु भविष्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर व शेततळे आहे.यासाठी ही योजना आहे. सौरपंप लावल्यानंतर शेतकऱ्यांनी बिल येणार नाही, परंतु ज्याच्या विहिरीवर विद्युत पुरवठा आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. ही अट आहे. पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी बांधवांनी या सौर कृषी पंपाचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले आहे. तसेच पाच वर्षापर्यंत या पंपाची देखभाल पुरवठा कंपनी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड बसणार आहे. भारनियमनापासून मुक्तता होईल तसेच कृषीपंप ८ ते १० तास चालणार आहे. इतर कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.देश स्वातंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहे. भाजप प्रणीत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्रासह राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत लोटत आहेत. सिंचनाअभावी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेवून शासनाने सौरकृषी पंपाची योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. (नगर प्रतिनिधी)