शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: December 12, 2015 00:43 IST

जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो.

नाना पटोले यांचे आवाहन : १९५ लाभार्थ्यांची निवड भंडारा : जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो. त्यामुळे शेतकरी यांचे फार मोठे नुकसान होते. ही बाब अनेक वर्षापासून प्रलंबित होती, परंतु सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सरकारने याला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.भंडारा जिल्ह्यासाठी शासनाने यावर्षी १९५ लाभार्थ्यांची निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यावेळी फक्त १९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु भविष्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर व शेततळे आहे.यासाठी ही योजना आहे. सौरपंप लावल्यानंतर शेतकऱ्यांनी बिल येणार नाही, परंतु ज्याच्या विहिरीवर विद्युत पुरवठा आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. ही अट आहे. पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी बांधवांनी या सौर कृषी पंपाचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले आहे. तसेच पाच वर्षापर्यंत या पंपाची देखभाल पुरवठा कंपनी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड बसणार आहे. भारनियमनापासून मुक्तता होईल तसेच कृषीपंप ८ ते १० तास चालणार आहे. इतर कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.देश स्वातंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहे. भाजप प्रणीत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्रासह राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत लोटत आहेत. सिंचनाअभावी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेवून शासनाने सौरकृषी पंपाची योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. (नगर प्रतिनिधी)