शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती मजबूत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:28 IST

आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.

ऑनलाईन लोकमततुमसर : आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.पंचायत समिती तुमसरच्या वतीने तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी व गौपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माडगी येथे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, शुभांगी राहांगडाले, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, पं.स. सदस्य कनपटे, पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चोपकर आदी उपस्थित होते.यावेळी नागपूरे यांनी, धानाची शेती करून शेतकरी स्पर्धेच्या युगात कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे लग्न व आवश्यक गरजा कधीही पूर्ण करू शकत नाही. निसर्गामुळे व शासनाच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे न्याय मिळणे अशक्य आहे. धानाची शेती परवडत नाही म्हणून शेतात ऊस लावले. पण कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. दुधापेक्षा बंद बॉटलचे पाणी महाग आहे. शासनाने दुधाचे भाव कमी करून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. परदेशात शेतकऱ्यांकडून दूध खरेदीवर सरकार आधारमूल्यापेक्षा दर लिटर पाच रुपये अतिरिक्त भाव देते. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी चार रुपये अतिरिक्त भाव द्यावा अशी मागणी हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.