शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती मजबूत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:28 IST

आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.

ऑनलाईन लोकमततुमसर : आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.पंचायत समिती तुमसरच्या वतीने तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी व गौपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माडगी येथे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, शुभांगी राहांगडाले, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, पं.स. सदस्य कनपटे, पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चोपकर आदी उपस्थित होते.यावेळी नागपूरे यांनी, धानाची शेती करून शेतकरी स्पर्धेच्या युगात कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे लग्न व आवश्यक गरजा कधीही पूर्ण करू शकत नाही. निसर्गामुळे व शासनाच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे न्याय मिळणे अशक्य आहे. धानाची शेती परवडत नाही म्हणून शेतात ऊस लावले. पण कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. दुधापेक्षा बंद बॉटलचे पाणी महाग आहे. शासनाने दुधाचे भाव कमी करून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. परदेशात शेतकऱ्यांकडून दूध खरेदीवर सरकार आधारमूल्यापेक्षा दर लिटर पाच रुपये अतिरिक्त भाव देते. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी चार रुपये अतिरिक्त भाव द्यावा अशी मागणी हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.