शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी भात शेतीसोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिक घेण्यात येते. शेतकऱ्यांनी भातशेती सोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम आदी व्यवसायावर भर द्यावा. जोडधंद्याची सांगड शेती सोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी शांतनू गोयल : शेतकरी मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिक घेण्यात येते. शेतकऱ्यांनी भातशेती सोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम आदी व्यवसायावर भर द्यावा. जोडधंद्याची सांगड शेती सोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृह येथे जैविक (आॅरगॅनिक शेती ) शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचे सदस्य डॉ. राजाराम त्रिपाठी, आॅरगॅनिक शेती तज्ञ अण्णाजी हांडे, महेंद्रसिंग ठाकूर, वनऔषधी उत्पादन तज्ञ शिप्रा त्रिपाठी, प्रकल्प संचालक (आत्मा) हिंदुराव चव्हाण, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.ए. कोठारी, ज्येष्ठ अधिवक्ता कांचन कोतवाल उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले,अनेक जिल्ह्यात ज्या मालास जास्त भाव मिळतो तेच पिक शेतकरी घेतात. गोसेखुर्द, बावणथडी प्रकल्प असे मोठे प्रकल्प असूनही शेतकरी पावसाच्या भरवश्यावर असतात. शेतकऱ्यांनी शेतीसह पुरक व्यवसायाकडे वळावे. जिल्ह्यात ५० ठिकाणी भात पिकासोबत तुती लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आत्माच्या योजनांचा लाभ घ्या, असेही ते म्हणाले.प्रारंभी वृक्षाला मान्यवरांच्या हस्ते पाणी देवून शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. आॅरगॅनिक शेती तज्ञ अण्णाजी हांडे, महेंद्रसिंग ठाकूर, अण्णाजी हांडे, प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचे सदस्य डॉ. राजाराम त्रिपाठी, यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी जैविक शेतीबाबत यथोचित मार्गदर्शन केले.तहसिलदार संजय पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजना विषयी माहिती दिली. त्यात नरेगाबाबत माहिती देतांना ते म्हणाले की नरेगा सर्व प्रथम भंडारा व गोंदिया जिल्हयात लागू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांची परिस्थिती सुधारण्यास रोजगार हमी योजना आवश्यक आहे. शाश्वत विकासाकडे भारताने पाऊल टाकणे हा नरेगा योजनेचा उद्देश आहे. समृध्द महाराष्ट्र जन कल्याण योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली. वनऔषधी उत्पादन तज्ञ शिप्रा त्रिपाठी यांनी शेतकऱ्यांवर आधारित कबीराची कविता सादर केली.