शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी भात शेतीसोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिक घेण्यात येते. शेतकऱ्यांनी भातशेती सोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम आदी व्यवसायावर भर द्यावा. जोडधंद्याची सांगड शेती सोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी शांतनू गोयल : शेतकरी मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिक घेण्यात येते. शेतकऱ्यांनी भातशेती सोबतच पुरक व्यवसायाकडे वळावे. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम आदी व्यवसायावर भर द्यावा. जोडधंद्याची सांगड शेती सोबत घातल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृह येथे जैविक (आॅरगॅनिक शेती ) शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचे सदस्य डॉ. राजाराम त्रिपाठी, आॅरगॅनिक शेती तज्ञ अण्णाजी हांडे, महेंद्रसिंग ठाकूर, वनऔषधी उत्पादन तज्ञ शिप्रा त्रिपाठी, प्रकल्प संचालक (आत्मा) हिंदुराव चव्हाण, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.ए. कोठारी, ज्येष्ठ अधिवक्ता कांचन कोतवाल उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले,अनेक जिल्ह्यात ज्या मालास जास्त भाव मिळतो तेच पिक शेतकरी घेतात. गोसेखुर्द, बावणथडी प्रकल्प असे मोठे प्रकल्प असूनही शेतकरी पावसाच्या भरवश्यावर असतात. शेतकऱ्यांनी शेतीसह पुरक व्यवसायाकडे वळावे. जिल्ह्यात ५० ठिकाणी भात पिकासोबत तुती लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. आत्माच्या योजनांचा लाभ घ्या, असेही ते म्हणाले.प्रारंभी वृक्षाला मान्यवरांच्या हस्ते पाणी देवून शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. आॅरगॅनिक शेती तज्ञ अण्णाजी हांडे, महेंद्रसिंग ठाकूर, अण्णाजी हांडे, प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचे सदस्य डॉ. राजाराम त्रिपाठी, यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी जैविक शेतीबाबत यथोचित मार्गदर्शन केले.तहसिलदार संजय पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध योजना विषयी माहिती दिली. त्यात नरेगाबाबत माहिती देतांना ते म्हणाले की नरेगा सर्व प्रथम भंडारा व गोंदिया जिल्हयात लागू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांची परिस्थिती सुधारण्यास रोजगार हमी योजना आवश्यक आहे. शाश्वत विकासाकडे भारताने पाऊल टाकणे हा नरेगा योजनेचा उद्देश आहे. समृध्द महाराष्ट्र जन कल्याण योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली. वनऔषधी उत्पादन तज्ञ शिप्रा त्रिपाठी यांनी शेतकऱ्यांवर आधारित कबीराची कविता सादर केली.