शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

शेतकºयांनी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:14 IST

निसर्गाच्या बदलत्या युगात शेतीत नवनवे प्रयोग करणे गरज आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत असून शेतकºयांनी......

ठळक मुद्देनाना पटोले : संकल्प ते सिद्धी कार्यक्रमात शेतकºयांनी घेतली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निसर्गाच्या बदलत्या युगात शेतीत नवनवे प्रयोग करणे गरज आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत असून शेतकºयांनी पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमध्ये प्रयोग करावेत व उत्पन्न दुप्पट होईल अशा पध्दतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र व आत्मा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने साकोली येथे आयोजित संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. परिणय फुके होते. तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, तहसीलदार अरविंद हिंगे, नवेगाव नागझिरा प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंद्रु पाठक, विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे, गटविकास अधिकारी तडस, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे, तालुका कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार, चौधरी, गेडाम व योगेश खिराळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संकल्प ते सिध्दी कार्यक्रमांतर्गत शेतकºयांनी सामुहिक शेतीचा संकल्प करुन गावनिहाय नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाबरोबरच पुरक व्यवसायाची साथ दिल्यास शेती उत्पन्नास वाढ होईल असे सांगून खासदार म्हणाले की, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशिर ठरु शकते.यावेळी बोलताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, पावसाचे दिवस कमी झाल्याने शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादन हे सुत्र विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली शेती फायदेशिर ठरु शकते.उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे, अपघात विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व इतर योजनांची माहिती दिली.कृषी पणन तज्ज्ञ यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सादरीकरणाद्वारे उपस्थित शेतकºयांना सात सुत्री कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाºया कृषीभूषण शेतकरी शेषराव निखाडे, मंदाबाई गावळकर या शेतकºयांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच आत्मा अंतर्गत गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी भंडारा व नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनी, धारगाव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकºयांना तंत्रज्ञानाची माहिती होण्याकरीता कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र साकोली, आत्मा भंडारा, सप्तरंगी शेतकरी उत्पादक कंपनी विरलीखंदार आदींनी सहभाग घेतला होता.