शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

शेतकरी म्हणतात, तर नुकसानीची चौकशी करणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST

कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ...

कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तयार करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्दनकाळ ठरू पाहत आहे.

न्यायासाठी बेटाळा येथे उपोषणावर बसलेले शेतकरी म्हणतात, वेळेत वीज बिल भरले नाही तर वीज महामंडळाकडून वीज कापली जाते. सावकार, पतसंस्था, बँक व सोसायट्यांचे कर्ज फेडले नाही तर ट्रॅक्टर व घरातील वस्तू उचलल्या जातात. आता बावनथडी प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात कालव्याद्वारे शेतशिवारात सोडण्यात आल्याने उभे गहू, हरभरा, लाखोरी व अन्य पीक सडली, कुजली. आता नुकसान भरपाई कोण देणार, असा प्रश्न आक्रोशित शेतकऱ्यांनी प्रशासनास विचारला आहे.

व पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही बावनथडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी साधी भेट दिली नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष व्यक्त होत आहे.

उपोषणकर्ते यांच्या प्रमुख मागण्या

कृषी विभाग व महसुल विभागाचेवतीने शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. इंदूरखा कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्यात यावी, बेजबाबदारपणास कारणीभूत कार्यकारी अभियंता उजवा कालवा क्रमांक ५ व कार्यकारी अभियंता बावनथडी प्रकल्प श्रेणी १ बघेडा यांच्यावर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे.