शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शेतकरी म्हणतात, पुन्हा धान पीक नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

या वर्षी धान पिकाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. संपूर्ण फेब्रुवारी महिना थंडीत गेला. खताचा व मजूर टंचाईचा सामना करीत अधिक पैसे मोजून रोवणी केली. मार्च महिना उजाडला आणि अर्ध्यात तापमानाने उच्चांक गाठला. पाण्याची पातळी खालावली. अशातच अघोषित भारनियमनाने सात दिवस पाठलाग केला. जमिनीला भेगा पडल्या. धान पिकाला गर्भावस्थेतच पाण्याचा ताण पडला. आज-उद्या म्हणता-म्हणता हप्ता गेला. अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांचा घात केला. जेमतेम पाणी आहे, असे शेतकरी सावध झाले आहेत.

मुखरू बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वाढते तापमान, त्यातच वीज भारनियमन अशा स्थितीत शेतातील धान पीक पाण्याविना शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाळत आहे. मात्र विहीर, बोअरवेलमध्ये पाणी असतानाही विजेअभावी सिंचन करणे कठीण जात आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा विजेचा जबर झटका बसत आहे. त्यामुळे पुन्हा धान पीक नको रे बाबा...! असे शेतकरी म्हणत आहेत.या वर्षी धान पिकाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. संपूर्ण फेब्रुवारी महिना थंडीत गेला. खताचा व मजूर टंचाईचा सामना करीत अधिक पैसे मोजून रोवणी केली. मार्च महिना उजाडला आणि अर्ध्यात तापमानाने उच्चांक गाठला. पाण्याची पातळी खालावली. अशातच अघोषित भारनियमनाने सात दिवस पाठलाग केला. जमिनीला भेगा पडल्या. धान पिकाला गर्भावस्थेतच पाण्याचा ताण पडला. आज-उद्या म्हणता-म्हणता हप्ता गेला. अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांचा घात केला. जेमतेम पाणी आहे, असे शेतकरी सावध झाले आहेत. अधिकची जोखीम पत्करून कमी पाण्यात शेतकरी धान पीक घेण्यासाठी आता घाबरलेला आहे. पाणी आहे पण वीज नाही ही मूळ समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसली आहे. धान पिकापेक्षा तितकाच नफा देणारे एखादे दुसरे पीक घेतलेले बरे, असे शेतकरी सांगत आहेत. शेतकरी प्रशांत सागर यांच्या शेतातील एक एकर धान वाळत आहे.

मका पिकाची होणार अधिक लागवड - वीज व पाण्याचे संकट अनुभवता भविष्यात लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात  भाजीपाला, कडधान्य, मका यासह कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकरी वळणार आहेत. पाण्याशिवाय शेती शक्य नाही. कमी पाण्याची शेती पिके काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शासन सुद्धा ठिंबक सिंचन सुविधाकरिता सकारात्मक आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज