शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

धान कापणीसाठी शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार नव्हते. सर्वच जण प्रचारात आणि रॅलीत मग्न असल्याचे दिसत होते.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाची धास्ती : मजुरीचा खर्च मशीनपेक्षा दुप्पट

खेमराज डोये ।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : विधानसभा निवडणूक आणि धान कापणीचा हंगाम एकच आल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा टंचाईचा सामना करावा लागला. त्यातच मजुरांचा खर्च मशीनपेक्षा दुप्पट असल्याने चौरास भागात शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरलाच अधिक दिसत आहे. शेतशिवारात सध्या हार्वेस्टरची घरघर सुरू असून भात कापणीच्या कामाला दिवाळीच्या तोंडावर वेग आला आहे.भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार नव्हते. सर्वच जण प्रचारात आणि रॅलीत मग्न असल्याचे दिसत होते. तसेही गत काही वर्षापासून मजुरांचा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा तर निवडणुकच होती. अशा परिस्थितीत आता शेतकरी यंत्राची मदत घेत आहे. परप्रांतातून आलेले हार्वेस्टर सहज उपलब्ध होत आहे. कमी वेळात भाताची कापणी होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरलाच दिसत आहे. त्यातही मजुरीचे दर आणि हार्वेस्टरचे भाडे यात चांगलीच तफावत आहे. हार्वेस्टर स्वस्त पडत असल्याने शेतकरी मशीननेच भात कापणी करीत आहे.धान पीक साठविणे आणि वाळविण्यासाठी शेतकऱ्यांना ताऱ्यावरची कसरत करावी लागते. मशीनद्वारे भात पिकाची कापणी केली तर शेतकऱ्यांना चार दिवस शेतात, रस्त्यावर धान्य सुकवावे लागते. नंतर ते घरी आणून साठवावे लागतात. याउलट मजुरीने धान कापले तर कापणीचा, धान बांधाईचा खर्च हार्वेस्टरपेक्षा दुप्पट येतो. हार्वेस्टर एकरी ८०० ते दोन हजार रूपये भाडे घेत आहे. मजुरीसाठी एका एकराला साधारणत: पाच हजार रूपये खर्च येत आहे. त्यामुळे शेतकरी मशीनलाच पसंती देताना दिसत आहे.ग्रामीण भागात आता निवडणुकीनंतर कापणीच्या कामाला वेग येणार असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पवनी तालुक्यातील चौरास भागात दिसून येत आहे.धान खरेदी सुरू झाली असती तरभंडारा जिल्ह्यात अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तर शेतकºयांना सरळ धान खरेदी केंद्रावर नेता आला असता. त्यातून साठवणुकीचा खर्च वाचला असता परंतु आता धान खरेदी केंद्रच सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घरी धान साठविण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती