शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

फळबाग योजनेतून मऱ्हेगावच्या शेतकऱ्याने शोधला प्रगतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

चुलबंद खोऱ्यात कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना ...

चुलबंद खोऱ्यात कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचविण्याकरिता पालांदूर मंडळ कृषी कार्यालय अख्ख्या जिल्ह्यात अग्रेसर आहे. नामदेव फुुुंडे हे शेतकरी बागायतीसह उन्हाळी धानाची शेती कसत आहे. यात कृषी विभागामार्फत अभ्यासाचा लाभ घेत विषमुक्त शेतीचे प्रात्यक्षिक यशस्वी केले आहे. आपल्या शेतात आठ आंब्याची झाडे लावलेली आहेत. झाडे फळांनी लदबदलेली आहेत. बांधावरील धुऱ्याच्या आधाराने पिकाचे नुकसान न होता आंब्याच्या झाडाची लागवड केलेली आहे. एक एकरात चार ते पाच झाडे व्यवस्थित अंतराने लागवड केलेली आहे. गत १० वर्षांपासून चुलबंद खोऱ्यातील आंब्यांना मोठी मागणी आहे.

कोट

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना व महात्मा गांधी रोजगार हमी योजनांतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर फळबागेचे नियोजन केले आहे. फणस, सीताफळ, पेरू, आंबा यासारखी फळझाडांची लागवड केलेली आहे. यात सर्वात जास्त ३९ हेक्टरवर आंबा पीक लागवडीखाली आलेले आहे. शेतकरीवर्गाला यातून अपेक्षित मोबदला अर्थात उत्पन्न मिळत आहे.

गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी पालांदूर

आंब्याची शेती निश्चितच फायदेशीर ठरली आहे. वर्षाकाठी दीड एकरातून फळांच्या क्षमतेनुसार ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न हमखास मिळते. घरीसुद्धा खायला मुबलकता येते. फळांसह सावली, शुद्ध हवासुद्धा मिळत असल्याने शेतीत फळझाडे अनमोल ठरलेली आहेत.

नामदेव फुंडे,

प्रगतशील शेतकरी, मऱ्हेगाव