शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

तुमसरच्या वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

फोटो तुमसर : धान पीक रोवणीकरिता सिंचनाची सोय असली तरी वीज वितरण कंपनीकडून थकीतबरोबर वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...

फोटो

तुमसर : धान पीक रोवणीकरिता सिंचनाची सोय असली तरी वीज वितरण कंपनीकडून थकीतबरोबर वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केल्याने, रोवणीयोग्य धान नर्सरी व धानपीक लागवडीकरिता शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, वीजपुरवठा खंडित करू नका, या मागणीला घेऊन तुमसरच्या वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मोर्चा काढण्यात आला.

मृग नक्षत्रात पावसाने जोरदार आगमन केले, त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीकरिता बियाणे बाजारातून विकत आणत शेतात पेरणी केली. आत सदर पेरणी केलेले धान बियाण्याची धान नर्सरी रोवणीयोग्य आली असली तरी पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून हुलकावणी दिली असल्याने शेतातील धान नर्सरी प्रखर उन्हाच्या तडाख्याने मरणासन्न अवस्थेत आली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धान पिकांची रोवणीसुद्धा केली आहे. सध्या धान रोवणीकरिता पाण्याची गरज असताना वीज वितरण कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याने ऐनदुष्काळाच्या तेराव्या महिन्यात सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात चिंतातुर झाला आहे.

तुमसर तालुक्यातील मरारसाखळी, झंजेरिया, पिपरा, आग्री आदी गावांतील संतप्त शेकडो शेतकरी तुमसर येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. दरम्यान, चक्क वीज वितरण उपविभागीय कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांविरोधात आपला संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली व गेल्या पंधरा दिवसांपासून मरारसाखळी व परिसरातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला व येथील वीजखांबांवरील विद्युत रोहित्रसुद्धा गेल्या एक वर्षापासून बंद व नादुरुस्त अवस्थेत असल्याने येथील नियमित वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा वीज वितरण कार्यालयातील उपविभागीय अधिकारी रूपेश अवचट व लाइनमन यांच्या निष्काळजीपणामुळे व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात संतापले आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नियोजनशून्यतेमुळे तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त मरारसाखळी परिसरातील शेतकऱ्यांना धान पीक लागवडीपासून व सिंचनापासून वंचित ठेवल्याचा डाव समोर आला आहे. त्यात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्वरत सुरू करण्यात येत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनी कार्यालयातून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वीज वितरण कंपनी कार्यालयात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, येथील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रूपेश अवचट यांना तुमसर तालुका छावा संग्राम परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल वराडे यांच्या नेतृत्वात सदर शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा खंडित वीजपुरवठा पूर्वरत सुरू ठेवण्याचे व नादुरुस्त विद्युत रोहित्र दुरुस्त करणे व जास्त क्षमतेचा विद्युत रोहित्र सदर ठिकाणी नव्याने लावणे, अशा विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कार्यालय शेतकऱ्यांनी गाठले. येत्या चार दिवसांत मागण्यांची पूर्तता झालीच नाही, तर आठ दिवसांनी परत हजारो शेतकऱ्यांचा उभारी मोर्चा तुमसर येथील वीज वितरण कार्यालयावर काढण्याचा इशारा ओबीसी छावा संग्राम परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल वराडे यांनी दिला. त्यावेळी प्रफुल्ल वराडे, साउजी शहारे, भारत रहांगडाले, सुभाष रहांगडाले, हरिओम पारधी, गेंदलाल रहांगडाले, राजकमल तुमसरे, गुणिलाल रहांगडाले, घनश्याम रहांगडाले, भाऊराव धुर्वे आदी शेतकरी उपस्थित होते.