शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची रोवणी करणे सुरू केले होते. परंतु थकीत ...

गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची रोवणी करणे सुरू केले होते. परंतु थकीत वीज बिलापोटी माडगी, बामणी, चारगाव, ढोरवाडा परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे सिंचन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माडगी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनाही बोलावण्यात आले. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रूपेश अवचट कार्यालयात दाखल झाले. आमदार कारेमोरे यांनी उपकार्यकारी अभियंता रूपेश अवचट यांच्याशी चर्चा केली. कृषी पंपाची वीज जोडणी पूर्ववत करण्यात यावी व वीज पुरवठा किमान दोन तास वाढवून देण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य के. के. पंचबुद्धे, देवसिंग सव्वालाखे, माडगीचे सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, चारगावचे सरपंच लक्ष्मण ढबाले, श्रीधर बोंद्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य चैनलाल मसरके, बामणीचे सरपंच रामप्रसाद काहलकर, रवी सार्वे, मनोहर वहिले, श्रीराम शेंडे, देवराम बोंद्रे, बोधानंद रोडगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.